शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

देशासाठी निधडी छाती... प्राणही घेऊ हाती!

By admin | Published: January 07, 2017 12:31 AM

एवढा एकच शब्द जाती-धर्मात दुभंगलेल्या नागरिकांना एका सुत्रात बांधण्यासाठी पुरेसा ठरतो.

देशप्रेम... एवढा एकच शब्द जाती-धर्मात दुभंगलेल्या नागरिकांना एका सुत्रात बांधण्यासाठी पुरेसा ठरतो. सैनिकांच्या छावण्यांमध्ये शिस्तीसोबतच हा सामाजिक सौहार्दही शिगोशिग पाहायला मिळतो. या देखावा पाहण्यासाठी सीमेवरच गेले पाहिजे असे नाही. नागरी भागात होणाऱ्या सैन्यभरतीच्या ठिकाणीही हे चित्र दिसते. गुरुवारी मध्यरात्रीपासून यवतमाळात सुरू झालेली सैन्यभरतीही त्यातलीच कडी. रात्री दीड वाजता भयंकर थंडी, त्यात विशीतले तरुण निधडी छाती उघडी करून शारीरिक चाचण्यांसाठी सज्ज... छाती, उंची मोजून झाल्यावर उंच उडी, धावण्याच्या कसोट्यांवरही प्राण पणास लावून खरे उतरले. मनात महत्त्वाकांक्षेचा दारूगोळा अन् डोळ्यापुढे एकच लक्ष्य, देशसेवा करायची आहे! यवतमाळ : विदर्भस्तरीय सैन्य भरतीसाठी यावेळी यवतमाळ शहराला लष्कराकडून मान देण्यात आला आहे. येथील जवाहरलाल नेहरू जिल्हा क्रीडा संकुलात ही भरती प्रक्रिया ७ जानेवारीपासून सुरू झाली आहे. येत्या १७ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. प्रत्यक्षात गुरुवारी मध्यरात्रीपासूनच प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच गोधणी रोडचा परिसर तरुणांच्या जथ्थ्यांनी गजबजून गेला. रात्री दीड वाजता या तरुण उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी सुरू झाली. नंतर होणाऱ्या शारीरिक चाचण्यांसाठी विद्यार्थ्यांचे नियोजनबद्ध गट तयार करण्यात आले. सकाळ होता-होता ही शारीरिक चाचणी सुरू झाली. एका रांगेत शिस्तबद्ध उभे असलेले तरुण एक-एक करुन पुढे आले. त्यांची उंची मोजण्यात आली. उंची मोजताक्षणी लष्करी अधिकारी जोरात ओरडून त्यांची उंची सांगायचा, दुसरा अधिकारी नोंदवून घ्यायचा. लगेच उमेदवाराचे वजन मोजले गेले. त्यानंतर पाठोपाठ छातीचे माप घेतले गेले. वजनमापात बसलेल्या तरुणांपुढे नंतरचे आव्हान होते उंच उडीचे. ९ फूट खड्ड्यावरून उडी मारण्याचे हे आव्हानही जवान पार करून गेले. त्यानंतर काही क्षणात ‘पुल अप्’करिता रेडी व्हायचे होते. उंच सिंगल बार धरून उमेदवारांना कमीत कमी १० वेळा ‘अप डाउन’ करण्याचा निकष आहे. नुसते १० पुल अप मारणेच पुरेसे नाही तर ते पुल अप कशा पद्धतीने एखादा उमेदवार मारतो, त्यावरही लष्करी अधिकाऱ्यांची करडी नजर आहे. पण बहुतांश नवजवानांनी हा टप्पाही लिलया पार केला. सर्वात महत्त्वाची कसोटी आहे रनिंगची. यात १६०० मीटर (१.६ किलोमीटर) अंतर अवघ्या ५ मिनिट ४० सेकंदात पार करायचे असते. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत तरुणांनी अत्यंत जोमाने रनिंग केली. या सर्व कसोट्यांमध्ये निवडल्या गेलेल्या तरुणांचे १-२ दिवसानंतर मेडीकल चेकअप केले जाणार आहे. हा झाला पहिला दिवस. अशीच प्रक्रिया १७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. शारीरिक चाचण्यांमध्ये फिट्ट बसलेल्या तरुणांची यापुढे लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर अखिल भारतीय मेरिट लिस्ट तयार केली जाईल, त्यानुसारच त्यांचे सिलेक्शन केले जाणार आहे, अशी माहिती मेजर अश्विनी पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.