शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कारभारीच अस्वस्थ; तब्बल शंभर ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक

By रूपेश उत्तरवार | Published: July 19, 2023 12:50 PM

३३८ ठिकाणी ग्रामपंचायत भवनही नाही : तर २४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्रलंबित

रुपेश उत्तरवार

यवतमाळ : गावच्या विकासामध्ये ग्रामपंचायतीची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहते. त्यामुळेच शासन ग्रामपंचायतींना विविध अधिकार देऊन विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी देत आहे; मात्र जिल्ह्यातील तब्बल १०० ग्रामपंचायतींचा कारभार नादुरुस्त इमारतीमधून सुरू आहे. तर ३३८ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नसल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे.

केंद्र तसेच राज्य शासनाने गावे स्वयंपूर्ण व्हावीत यावर भर दिला आहे. गावांच्या विकासकामांसाठी राज्य तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधीही दिला जात आहे; मात्र ज्या ठिकाणाहून हा सर्व कारभार चालतो, तेथील पदाधिकारी, कर्मचारीच सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सुमारे १०० वर ग्रामपंचायतींची अवस्था अत्यंत बिकट आहे; मात्र तरीही ग्रामसेवक तसेच इतर कर्मचारी या धोकादायक ठिकाणी बसूनच गावाचा कारभार हाकत आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायतींमध्ये वर्षाचे १२ ही महिने ग्रामस्थांची विविध कामांसाठी गर्दी असते. एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मागील वर्षी जनसुविधा तसेच आमदार आणि खासदार निधीतून जिल्ह्यातील १६ ठिकाणी ग्रामपंचायत भवनची उभारणी झाली असली तरी नादुरुस्त असलेल्या १०० ग्रामपंचायतींच्या दुरुस्तीबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. २०१८-१९ या वर्षात स्व. बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत योजनेतून बांधकामासाठी २४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते; मात्र तीन वर्षे उलटली तरी या ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी निधी प्राप्त झालेला नाही.

इमारत कोसळण्याची वाटते भीती

ग्रामपंचायतीची इमारत मोडकळीस आली आहे. ही जीर्ण स्वरूपातील इमारत कधी कोसळेल याची भीती वाटते. यामुळे आम्ही ग्रामपंचायतीचे दार उघडत नाही. या ठिकाणचे रेकॉर्ड शाळेच्या खोलीत हलविले आहे. बैठक शाळेच्या खोलीत घेतली जाते. ग्रामसभा समाज भवनात घ्यावी लागते. - मारोती सुनील गेजीक, सरपंच बोथबोडन

ग्रामसभा होते खुल्या मैदानात

ग्रामपंचायत इमारत नाही. गावातील गजानन महाराजाच्या मंदिराजवळ असलेल्या खोलीत कार्यालय चालविले जाते. ग्रामसभा घ्यायची असेल तर खुल्या मैदानात घ्यावी लागते. चार-पाच महिन्यांआधी यासाठी प्रस्ताव पाठविले होते. अजूनही मंजुरी मिळाली नाही.

- शीतल कुरटकर, उपसरपंच, कोठोडा

मारुती मंदिराच्या हॉलमध्ये ग्रामसभा

ग्रामपंचायतीची जुनी इमारत अपुरी आहे. या ठिकाणी नवीन इमारतीचा प्रस्ताव दिला आहे. या ठिकाणी सदस्य बसू शकतात; मात्र ग्रामसभा घ्यायची म्हटली तर मारुती मंदिराच्या हॉलमध्येच सभा घ्यावी लागते.

- पूजा खोडे, सरपंच, सातेफळ

अजून प्रस्तावाला मंजुरी नाही

राजीव गांधी ग्रामपंचायत भवनासाठी नरेगामधून प्रस्ताव पाठविण्यात आला; मात्र याला मंजुरी मिळाली नाही. जुन्या इमारतीमध्ये कार्यालय आहे. बैठक घ्यायची म्हटले तर गावातील बिरसामुंडा हॉलमध्ये सभा घ्यावी लागते.

- सोनाली पुरुषोत्तम टिचुकले, सरपंच, जांब

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतYavatmalयवतमाळ