शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नरभक्षक ‘अवनी’ला नाईलाजाने ठार केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:02 IST

आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणाºया नरभक्षक वाघिण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला.

ठळक मुद्देशृूटर नवाबची स्पष्टोक्ती : गावकऱ्यांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणाºया नरभक्षक वाघिण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला. मात्र तिने थेट झडप घातल्याने आमच्या सोबतच्या इतरांचे संरक्षण करण्यासाठी नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली, अशी स्पष्टोक्ती हैदराबाद येथील शुटर (हंटर) नवाब शहाफत अली खान यांनी दिली.राळेगाव-पांढरकवडा तालुक्यातील वाघग्रस्त सावरखेड, वरध, वेडशी, खैरगाव, बोराटी, सराटी, लोणी, बंदर, तेजनी, विहीरगाव, वाढोणाबाजार व परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मंगळवारी रात्री सावरखेड येथे नवाब व त्यांच्या मुलाचा आणि इतर दोघांचा जाहीर सत्कार घेतला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नवाबने उपरोक्त भूमिका मांडली.सोशल मीडिआ, राजकीय मंडळी, पक्ष व वन्यजीव प्राणी मित्र आदी नरभक्षक अवनी वाघिणीस का मारले, असा जाब सरकारला विचारत असताना वाघिणग्रस्त परिसरातील ग्रामस्थांनी हा जाहीर सत्कार केला. सुमारे वर्षभर वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी दिल्यानंतर अवनीला ठार मारण्यात यश आले. याच नरभक्षक वाघिणीने १३ शेतकरी, मजुरांचे बळी घेतले. वाघिण ठार झाल्याने परिसरातील जनता आनंदी झाली. खैरगाव कासार येथील स्वाती ठाकरे यांनी वाघिण ठार झाल्यामुळे जनता मोकळा श्वास घेऊ लागली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.ग्रामस्थांनी शहाफत अली खान, अजगर अली खान व दोघांचा शाल, श्रीफळ व वाघिणीचे छायाचित्र भेट देऊन सत्कार केला. यावेळी अशोक केवटे, अरविंद वाढोणकर, अरविंद फुटाणे आदींनी मत मांडले. अवनीच्या मृत्यूवरून राजकीय पक्षांनी, नेत्यांनी राजकारण करू नये, असे त्यांनी ठणकावले. प्राण्यांच्या जीवापेक्षा मानवाचा जीव महत्वाचा असून वन्यप्राणीमित्रांनी वाघग्रस्त भागातील लोकांच्या भावना जाणून घ्यावा, असे आवाहनही केले. आभार वेडशीचे सरपंच अंकुश मुनेश्वर यांनी मानले.शेवटपर्यंत अवनीला वाचविण्याचा प्रयत्नसत्काराला उत्तर देताना शूटर शहाफत अली खान यांनी मीदेखील प्राणीमित्रच आहे. मानवाप्रमाणे, प्राण्यांप्रमाणे वन्यप्राण्यांचाही प्राण आहे. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. मी आजपर्यंत अनेक ठिकाणी वाघांना बेशुद्धदेखील केले. सुरुवातील ट्रॅक्यूलाईझ डॉट मारला. आता १५ ते २० मिनिटांनी ती बेशुद्ध होईल असे वाटले. पण ती अधिक आक्रमक झाली. अवनी झुडूपात लपली. आम्ही पाळतीवर होतो. अशातच तीने आमच्या जिप्सीवर हल्ला केल्याने शेवटच्या क्षणी आमचे प्राण धोक्यात येणार होते. आम्ही रक्षणार्थ गोळी झाडली. मात्र गोळी झाडताना प्रचंड वेदना झाली. तथापि नाईलाज होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणYavatmalयवतमाळ