शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

बाबासाहेबांच्या विचारांचा उत्सव साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:22 PM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त पेन उचलला आणि भारताचा इतिहास बदलला. बाबासाहेबांनी भारतीय समाजाला चिकित्सेसोबतच विज्ञानवादी धर्म शिकविला.

ठळक मुद्देविवेक मोरे : पुसदच्या धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील तृतीय पुष्प

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त पेन उचलला आणि भारताचा इतिहास बदलला. बाबासाहेबांनी भारतीय समाजाला चिकित्सेसोबतच विज्ञानवादी धर्म शिकविला. त्यांना व्यक्तीपूजा अथवा व्यक्तीस्तोम मान्य नव्हते. अनुयायांनी बाबासाहेबांच्या जयंतीचे अवडंबर न करता त्यांच्या समाजोधारक विचारांचा उत्सव साजरा करावा, असे आवाह मुंबई येथील उठाव साहित्य मंचचे अध्यक्ष विवेक मोरे यांनी येथे केले.स्थानिक महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ‘आंबेडकरी चळवळीची दशा व दिशा’ या विषयावर ते तृतीय पुष्प गुंफताना बोलत होते. अध्यक्षस्थानी पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे होते. यावेळी राजेश आसेगावकर, प्रदीप ढबाले, ए.सी. कांबळे, संजय कांबळे, प्रमोद सोनटक्के उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदर्शनगर येथील धम्मचक्र महिला मंडळाच्यावतीने बुद्धवंदना सादर करण्यात आली.विवेक मोरे म्हणाले, ‘फुल्यांनी काढल्या शाळा, बाबासाहेब काढलं कॉलेज, आमचं मात्र आज, सगळं वाया गेलं नॉलेज’ सद्यस्थितीत बाबासाहेबांचे अनुयायी त्यांच्या विचारांशी फारकत घेऊन आचरण करीत आहे. बाबासाहेबांच्या जयंती दिनी डिजेच्या तालावर तरुणाई थिरकते हे सर्व बंद झाले पाहिजे. १४ एप्रिल हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांनी आयएफएस कसा झालो याचा सविस्तर प्रवास कथन केला. मनुष्य पैशाने नव्हे तर विचाराने गरीब असल्याचे प्रतिपादन केले. सुरुवातीला ‘भीम जयंती साजरी करू’ या समूहनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेश खडसे यांच्यातर्फे पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले. संचालन नरेंद्र पाटील यांनी, आभार दीपक मेश्राम यांनी मानले. यावेळी प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष सुरज वरठी, प्रा. विलास भवरे, प्रा. कल्याण साखरकर, गणेश वाठोरे आदी उपस्थित होते.