शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

प्रमाणपत्र वाटपाची चौकशी

By admin | Published: April 15, 2017 12:22 AM

मारेगाव येथील एका विशिष्ट सेतू केंद्राकडून वितरित करण्यात आलेले विविध प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

दाखल्याविनाच प्रमाणपत्र : मारेगाव तहसीलदारांना मागितला खुलासा वणी : मारेगाव येथील एका विशिष्ट सेतू केंद्राकडून वितरित करण्यात आलेले विविध प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सेतू केंद्रावर तहसीलदारांची असलेली विशेष मर्जी यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. यामुळे आता खुद्द तहसीलदारच अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात मारेगाव येथील विशाल मनोहर किन्हेकर यांनी थेट वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत तहसीलदारांना लेखी स्वरूपात खुलासा मागविला आहे. मारेगाव येथील तहसील कार्यालय परिसरात आशिष विजय येरणे यांचे महा-ई सेवा केंद्र आहे. या केंद्रातूनच विना दाखल्याने प्रमाणपत्र वितरीत केल्याची तक्रार विशाल किन्हेकर यांनी एसडीओकडे केली आहे. महा-ई सेवा केंद्रातून आॅनलाईन पद्धतीने दाखले दिले जातात. या दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्याशिवाय हे प्रमाणपत्र देता येत नाही. असे असताना येरणे याच्या महा-ई सेवा केंद्रातून अशा आवश्यक कागदपत्राविनाच प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गंभीर बाब ही की, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असताना तसे कागदपत्रे न जोडताही संबंधित महसूल अधिकाऱ्याने सदर प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या कशा, ही बाबही आता चौकशीच्या कक्षेत आहे. सेतू केंद्रातून कोणतेही आवश्यक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित अर्जदाराला त्याच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असते. अर्ज प्राप्तीनंतर सेतू केंद्र संचालक कागदपत्रांची तपासणी करून महा आॅनलाईन या पोर्टलवर सदर कागदपत्रे अपलोड करतो. त्यानंतर संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव जातो. महसूल अधिकाऱ्याने कागदपत्रांची तपासणी करूनच त्यावर डिजीटल स्वाक्षरी करावी, अशी एकूण पद्धत आहे. मात्र मारेगाव येथील आशिष येरणे याच्या सेतू केंद्रातून या पद्धतीला तिलांजली देण्यात आली आहे. याची सखोल चौकशी केल्यास मोठे गौडबंगाल उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येते. त्यात काही महसूल अधिकारीही गुंतले असल्याची चर्चा आहे. (कार्यालय प्रतिनिधी) तहसीलदारांकडून १५ दिवसानंतरही उत्तर नाही विशाल किन्हेकर यांनी आशिष येरणे याच्याविरुद्ध उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मिश्रा यांनी यासंदर्भात मारेगावचे तहसीलदार विजय साळवे यांना ३१ मार्च रोजी पत्र देऊन पाच दिवसांच्या आत स्पष्टीकरणासह खुलासा मागितला. मात्र साळवे यांनी १५ दिवस लोटूनही या विषयात एसडीओंकडे खुलासा सादर न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.