शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Lok Sabha Election 2019; काँग्रेसने देश गरीब करण्याचे काम केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:49 IST

काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : आर्णी येथे जाहीर सभेत टिकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात देशाची मान उंचावली. मोदी यांनी देशातील सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काँग्रेस गेल्या ६0 वर्षांपासून जनतेला केवळ उल्लू बनवीत आहे. खोटे बोलण्यात काँग्रेस पटाईत आहे. राहूल गांधी यांना आजी, आजोबा व घराण्याची परंपरा आहे. त्याच पुण्याईवर ते तग धरून आहे. मोदी यांनी जनधन योजना आणली. प्रत्येक घरी शौचालय दिले. प्रत्येकाला घरकूल देण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधानांनी उरी घटनेनंतर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून अतिरेक्यांचा बदला घेतला. पुलवामा घटनेत शहीद झालेल्या विरांचा बदला घेण्यासाठी सैनिकांना खुली सूट दिली. हे काम काँग्रेसने ६0 वर्षे कधीच केले नाही, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राजू तोडसाम, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, प्रभाकर जीवने, अशोक जिवतोडे, एन.टी. जाधव आदी उपस्थित होते.दुधवाला की दारूवाला हे तुम्हीच ठरवाचंद्रपूर मतदार संघातून दुधवाला उमेदवार विजयी करायचा की दारूवाला, हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019