शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

काँग्रेस नेते विधानसभा क्षेत्रात

By admin | Published: February 05, 2017 12:50 AM

जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यावरून काँग्रेस नेत्यांमधील भांडणे मुंबईपर्यंत गाजली असली तरी सध्या ती बाजूला सारण्यात आली आहे.

जिल्हा परिषद निवडणूक : गटबाजी बाजूला, प्रतिष्ठा पणाला यवतमाळ : जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यावरून काँग्रेस नेत्यांमधील भांडणे मुंबईपर्यंत गाजली असली तरी सध्या ती बाजूला सारण्यात आली आहे. या नेत्यांवर आपल्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. प्रतिष्ठा राखण्यासाठी हे नेते कामाला लागले आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी व भांडणे सर्वश्रृत आहेत. जिल्हाध्यक्ष पदाचा वाद गाजला. त्यावर पडदा पडते तोच जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवरून बरेच वादंग झाले. दप्तर आदळण्यापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या या गटबाजीपुढे आपला संताप व्यक्त केला. मात्र तिकीटांचे वाटप झाल्यानंतर अचानक ही गटबाजी थंडावल्याचे चित्र आहे. जणू आमच्यात गटबाजी नव्हतीच, असे भासविण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू आहे. पक्षाने विधानसभेच्या पराभूत उमेदवारांना अर्थात काँग्रेसच्या या दिग्गज नेत्यांना आपआपल्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे गटबाजी बाजूला सारुन हे सर्व नेते आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक जागा मिळविणे व पंचायत समित्याही ताब्यात घेऊन आपले वर्चस्व सिद्ध करणे हे ध्येय या नेत्यांनी ठेवले आहे. पालकमंत्री पदाच्या फेरबदलावरून शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये ठिणगी पडली आहे. त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसतो आहे. काँग्रेस सर्वदूर पोहोचली आहे. हवेची झुळूक आली तरी पक्षाचा फायदा होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत गतवेळी पेक्षा काँग्रेसच्या जागा वाढतील, असा दावा नेत्यांकडून केला जात आहे. त्यासाठी नोटाबंदी हे प्रमुख कारण सांगितले जाते. नोटाबंदीने ग्रामीण जनतेला छळले आहे. नुकत्याच झालेल्या केंद्राच्या बजेटने जनतेच्या अपेक्षा फोल ठरविल्या आहेत. कर्जमुक्ती, शेतमालाला वाढीव भाव, जनधनच्या खात्यात ठेव या भाजपाच्या घोषणा पोकळ ठरल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसच्या काळात लाल्या, खरडी, गारपीट या सारखे अनुदान सातत्याने मिळत होते. मात्र भाजपा सरकारमध्ये त्याचा अभाव आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी घरकुल योजनेची घोषणा केली गेली. मात्र प्रत्यक्षात या योजनेचे कामही सुरू झाले नाही. या उलट काँग्रेसने ऐतिहासिक निर्णय घेऊन तीन लाख घरकूल बांधल्याचे काँग्रेस नेत्यांकडून सांगितले जाते. भाजपा सरकारच्या नेत्यांची बयाणे व त्यांची एकूणच पावले आरक्षण उठविण्याकडे असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व मुद्यांवर प्रकाशझोत टाकून काँग्रेस नेते जिल्हा परिषदा बळकाविण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस हाच सक्षम पर्याय असल्याचा दावा या नेत्यांकडून केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)