शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

नोटाबंदी विरोधात कचेरीवर काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

By admin | Published: January 07, 2017 12:19 AM

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नेतेमंडळींनी सरकारचा केला निषेध

यवतमाळ : नोटबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी अडचणीत आले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधोगतीकडे नेण्यात येत आहे. नोटबंदी करून सामान्य माणसांचा पैसा बँकेत भरून घेतला. याच पैशातून मोठ मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले, असा आरोप जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात केला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी सरकारचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जनआक्रोश मोर्चा हा पोस्टल मैदानातून निघाला. यात शेतकरी, शेतमजूर आणि काँग्रेसची सर्वच नेतेमंडळी उपस्थित होती. मोर्चा नेताजी चौक, दत्त चौक आणि बसस्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. येथे विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार कीर्ती गांधी, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच सोमवारी जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकेसमोर आंदोलन करण्याचे आवाहन श्याम उमाळकर यांनी केले. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मोर्चात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)