शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
4
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
5
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
6
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
7
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
8
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
9
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
10
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
11
RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड
12
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
13
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
14
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
15
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
16
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
17
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
18
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
19
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
20
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!

तंटामुक्त समित्यांचे गावांवरील नियंत्रण सुटले

By admin | Published: October 15, 2015 3:01 AM

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या व पोलीस विभागातील समन्वयाअभावी पुरस्कारप्राप्त गावात आता वाद निर्माण होत असून या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटले आहे.

पुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या व पोलीस विभागातील समन्वयाअभावी पुरस्कारप्राप्त गावात आता वाद निर्माण होत असून या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटले आहे. तसेच गावात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले असून पुरस्कारप्राप्त गावांचेच आता सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे.गावात उद्भवणाऱ्या लहानसहान तंट्यांचे मोठ्या भांडणात रूपांतर होवू नये, गावातील वाद गावातच सोडविला जावा, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, गावात सामाजिक सलोखा व शांतता टिकावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. तंटामुक्त गाव समिती आणि पोलिसांच्या सहकार्यातून अनेक गावातून अवैध व्यवसायांचे उच्चाटन झाले. गावात शांतता व सुव्यवस्था नांदू लागली. परंतु आता या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटल्याचे दिसत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करणाऱ्या तंटामुक्त समित्यांना लोकसंख्येच्या निकषावर पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार राशी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होताच तंटामुक्त समिती व नियंत्रकांचा ग्रामपंचायत कमिटीला विसर पडला. त्यांना विश्वासात न घेता सरपंच, सचिवांनी निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य खर्च करणे सुरू केले. या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांची गावावरील पकड सैल झाली. गावात पुन्हा अवैध धंदे फोफावू लागले. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय केला जात आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच मटका, जुगार, दारू आदींच्या मागे लागले आहे. यातून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गावात भानगडीही निर्माण होत आहे.पुरस्कारप्राप्त गावांचीच ही अवस्था असेल तर इतर गावांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आता पुरस्कारप्राप्त गावांचे सर्वेक्षण पुन्हा करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातून गाव समित्यांना पुन्हा ऊर्जा मिळेल आणि नव्या दमाने काम करण्याची संधी निर्माण होईल. (तालुका प्रतिनिधी)