शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

कोरोनाची बळीसंख्या सातशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:41 AM

मंगळवारी सात मृत्यू : यवतमाळचे तीन, महागाव दोन तर पांढरकवडा व वणीचा एक यवतमाळ : जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाने अवघ्या ...

मंगळवारी सात मृत्यू : यवतमाळचे तीन, महागाव दोन तर पांढरकवडा व वणीचा एक

यवतमाळ : जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाने अवघ्या साडेतीनशे दिवसात ७०१ माणसांचा बळी घेतला. गेल्या दीड महिन्यापासून दररोज सुरू असलेली मृत्यूमालिका मंगळवारीही कायम राहिली. मंगळवारी कोरोनाने आणखी सात रुग्ण मारले. तर दिवसभरात ३२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अजूनही ३१०२ रुग्णांची कोरोनाशी झुंज सुरूच असून गेल्या १५ दिवसांपासून कायम असलेला २.२४ हा मृत्यूदर कमी होताना दिसत नाही.

मंगळवारी दगावलेल्या सात जणांपैकी तिघे यवतमाळातील आहेत. त्यात एक ६२ व एक ७२ वर्षीय पुरुष आहे. तसेच एका ५८ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. याशिवाय महागावमधील ६१ व ८२ वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ८० वर्षीय पुरुष, वणी येथील ७८ वर्षीय पुरुषाचाही मंगळवारी मृत्यू नोंदविला गेला.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालानुसार मंगळवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या ३५७ जणांपैकी २०७ पुरुष तर १२० महिला आहेत. यात १०६ पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या यवतमाळात आढळले हे विशेष. तसेच उमरखेड ८१, महागाव २९, पुसद २३, कळंब १४, नेर १४, झरी जामणी १४, घाटंजी ११, आर्णी ११, वणी १०, दारव्हा ९, दिग्रस ८, पांढरकवडा ५, बाभूळगाव ४ तर अन्य शहरातील आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

मंगळवारी एकूण ३३९३ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यापैकी ३२७ पॉझिटिव्ह तर ३०६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१०२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी १५९६ रुग्ण रुग्णालयात भरती असून १५०६ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या तब्बल ३१ हजार २७९ आहे. गेल्या २४ तासात ३३७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या २७ हजार ४७६ इतकी आहे. या दरम्यानच्या काळात ७०१ नागरिकांचा मृत्यू नोंदविला गेला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर १०.७१ असून मृत्यूदर २.२४ इतका आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत दोन लाख ९१ हजार ९८१ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी दोन लाख ८९ हजार ९५ अहवाल प्राप्त झाले. तर दोन हजार ८८६ अहवालांची प्रतीक्षा आहे. तसेच दोन लाख ५७ हजार ८१६ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले.

बॉक्स

संक्रमणाची गती थांबता थांबेना

जिल्ह्यात कोरोना पसरण्याचा वेग गेल्या महिनाभरापासून कायम आहे. दररोज सुमारे ४०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर गेल्या १५ दिवसांपासून दहापेक्षा जास्त आहे. विभागीय आयुक्तांनी आढावा घेऊन हा दर कमी करण्याचे नुकतेच निर्देशही दिले. मात्र प्रशासनाने जंगजंग पछाडल्यानंतरही पॉझिटिव्हिटी दर मंगळवारपर्यंत १०.७१ इतकाच कायम होता. त्याहून गंभीर म्हणजे दररोज ८ ते १२ रुग्णांचा मृत्यू नोंदविला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदरही १५ दिवसांपासून २.२४ इतकाच कायम आहे. पॉझिटिव्हिटी आणि डेथ रेट हे दोन्ही आकडे कमी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.