शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
2
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
5
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
6
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
7
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
8
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
9
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
10
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
11
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
12
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
13
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
14
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
15
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
16
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

वऱ्हाडातील कापूस बेल्ट 'लाल्या'ने होरपळला; सात लाख हेक्टरचे नुकसान

By रूपेश उत्तरवार | Published: November 12, 2022 12:45 PM

दोन वेचण्यांतच उलंगवाडी

यवतमाळ : संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा प्रांत कापूस उत्पादक प्रांत म्हणून ओळखला जातो. गतवर्षी कापसाला चांगला दर मिळाला. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी कापसाकडे वळले. मात्र शेतशिवारावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले. दोन वेचण्यांतच कापसाची उलंगवाडी होईल, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यातून कापसाचे एकूण उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे यंदाचा कापूस हंगाम ६५ लाख गाठींवर थांबण्याचा धोका कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

परतीच्या पावसाने कापसाच्या पिकाचे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राज्यभरात झालेल्या कापूस लागवडीच्या क्षेत्रातील २७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १७ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भ आणि मराठवाड्यातील आहे. एकूण क्षेत्रापैकी ७ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाला लाल्या रोगाने भुईसपाट केले आहे. याठिकाणी पहिल्या ते दुसऱ्या वेचणीतच पन्हाटीची झाडे लाल पडली. कापसाचे बोंड फुटून कपाशी निर्जीव झाली आहे. येथे पुन्हा "कापसाचे उत्पादन येणार की नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, शेगाव, खामगाव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये कपाशीचे पीक लाल पडले आहे. संपूर्ण कापूस एकाचवेळी फुटला आहे. नव्याने पात्या, बोंड आणि हिरवी पालवीच पिकांना राहिलेली नाही. यामुळे शेतकरी अधिक चिंतेत सापडले आहेत. मुख्यतः याच भागातून कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. सध्या याठिकाणी जिनिंगमध्ये कापूसच विक्रीला येण्याचे प्रमाण घटले आहे. शेतकऱ्यांच्या घरात मोजकाच कापूस शिल्लक राहिला आहे.

दरवर्षी देशभरात ८५ ते ९० लाख कापूस गाठींचे उत्पादन कापूस प्रांतात होते. यावर्षी कापसाची स्थिती गंभीर असल्याने हे उत्पादन ६५ लाख गाठींपर्यंत खाली येण्याचा धोका वर्तविला जात आहे. यातून शेतीचे अर्थकारणच बदलण्याचा धोका आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागणार आहे.

तर रब्बीचे पीक घ्यावे लागेल 

लाल्यामुळे कापूस उत्पादक प्रांतातील शेतकरी तूट भरून "काढण्यासाठी गहू आणि हरभऱ्याची लागवड करण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यातून रब्बीचे क्षेत्र सर्वत्र अचानक वाढण्याची शक्यता आहे.

निसर्ग प्रकोपाने कापसाचे उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी एक ते दोन वेचण्यांत कापसाची उलंगवाडी होणार आहे. अशा स्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अमेरिकेप्रमाणे सबसिडी द्यावी. कापसाचे भाव जाहीर करण्यापेक्षा रुईचे दर जाहीर करावे. कापूस आयातीवर कर लावावा आणि कापूस गाठींच्या वाहतुकीला सबसिडी द्यावी.

विजय जावंधिया, कृषी अभ्यासक

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसVidarbhaविदर्भ