शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

५१ हजार हेक्टरमधील पिके धोक्यात़, पांढरकवडा तालुका : दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:27 AM

पुरेसा पाऊस येईल, या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वरुणराजाने अवकृपा केल्यामुळे पाऊसच ...

पुरेसा पाऊस येईल, या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वरुणराजाने अवकृपा केल्यामुळे पाऊसच नाही. त्यामुळे पावसाअभावी सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस आदी पिके होरपळत आहेत. यावर्षी कपाशीपाठोपाठ सोयाबीनचा पेराही वाढला आहे. ५२ हजार ८७३ हेक्टर जमिनीपैकी तब्बल ३८ हजार ३०४ हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा आहे. त्याखालोखाल शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. यावर्षी बियाणाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे मशागतीसाठी शेतकऱ्यांना भरपूर खर्च करावा लागला. त्यात मागील दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. आधीच शेतकऱ्यांनी परिश्रम घेऊन आपल्या शेताची मशागत केली. खासगी सावकाराकडून पैसे घेतले, अनेकांनी उसनवारी करून बियाणे खरेदी केले. काहींनी तर घरचे दागिने गहाण ठेवून बियाणाची सोय केली. तसेच रासायनिक खते व इतर वस्तूंची खरेदी केली; परंतु महागडे बियाणे आता मातीमोल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु पाऊस तर सोडाच चांगले कडाक्याचे ऊन तापत आहे. त्यामुळे पिकांनी माना खाली टाकल्या. हे चित्र तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. आधीच शेतकऱ्यांनी उसनवारी करून खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन महागडे बियाणे खरेदी केले. परंतु हे बियाणे आता मातीमोल होत असल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी तरी कशी असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.