शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

अतिवृष्टीमुळे पीक गेले; यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 5:34 PM

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतशिवार उद्ध्वस्त केले. पिकांची दुर्दशा पाहून हतबल झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

यवतमाळ : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाती आलेला हंगाम हिरावल्यामुळे वैफल्यग्रस्त दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पहिली घटना महागाव तालुक्यातील दहिवड (खुर्द) येथे, तर दुसरी घटना पुसद तालुक्यातील भंडारी येथे घडली.

मनोहर नारायण पवार (३४), असे दहिवड (खुर्द) येथील मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे ते निराश होते. खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतशिवार उद्ध्वस्त केले. पिकांची दुर्दशा पाहून हतबल झालेल्या मनोहर पवार यांनी शनिवारी सायंकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, तीन मुली व आप्त परिवार आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

पुसद तालुक्यातील भंडारी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. दुसऱ्या घटनेत अशोक सखाराम आडे (४४), असे भंडारी येथील मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री त्यांनी स्वत:च्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावला. ही घटना १४ ऑक्टोबरला उघडकीस आली. ग्रामीण पोलिसांना घटनास्थळ गाठून मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके यांच्या मार्गदर्शनात जमादार आनंद शेळके, श्याम घुगे, अनिल राठोड तपास करीत आहेत. तहसीलदार डॉ. राजेश चव्हाण यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. त्यांचा अहवाल आल्यानंतर शासनाकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबास जास्तीत जास्त मदत मिळावी, याकरिता प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे तहसीलदार डॉ. राजेश चव्हाण यांनी सांगितले.

शेतकरी आत्महत्यांची दखल घ्यावी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी मृत शेतकरी मनोहर नारायण पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. अति पावसाने शेतकरी उघड्यावर आले आहेत. मात्र, शासन कुंभकर्णी झोपेत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. शासनाने घोषित केलेली नुकसानभरपाईसुद्धा थंडबस्त्यात आहे. शासनाच्या कोरड्या घोषणांमुळे शेतकरी आत्महत्येच्या दारात पोहोचले असून, शेतकरी आत्महत्यांची दखल मानवाधिकार आयोग आणि संयुक्त राष्ट्रसंघाने घ्यावी, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीagricultureशेती