शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बंद घरात आढळला मृतदेह, पाेलिसांना कारवाईसाठी हवी तक्रार

By सुरेंद्र राऊत | Updated: May 21, 2024 21:16 IST

अवधुतवाडीचा कारभार : नैसर्गिक मृत्यू झाल्याचा लावला कयास

यवतमाळ : शहरातील आर्णी मार्गावर अमृत सेलिब्रेशन मागे एका बंद घरातून अचानक दुर्गंधी येवू लागली. परिसरातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी खिडकीतून डाेकावून पाहिले असता, तिथे एक कुजलेला मृतदेह आढळून आला. याची माहिती अवधुतवाडी पाेलिसांपर्यंत पाेहाेचली. दरम्यान सबंधित व्यक्तीचे नातेवाईकही तेथे पाेहाेचले, त्यांनी तक्रार देणार नाही, अशी भुमिका घेतल्याने पाेलिसांनी त्यांच्या स्तरावर नैसर्गिक मृत्यू असे म्हणून प्रकरण निकाली काढले. यात पाेलिसांकडून प्रचंड हलगर्जीपणा हाेत असल्याचे कायदे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे.

एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ताे नैसर्गिक किंवा अनैर्सिगक याचा शाेध घेण्याची जबाबदारी पाेलिसांची आहे. फाैजारी प्रक्रिया संहितेनूसार अशा प्रकरणात कलम १७४ नूसार नाेंद घेवून पाेलिसांना पुढाकार घेत तपास करावा लागताे. मृत्यूचे नेमके कारण पुढे आल्यानंतर हे प्रकरण निकाली काढले जाते. मात्र अवधुतवाडी पाेलिसांनी एका बंद घरात कुजलेला मृतदेह आढळल्यानंतर केवळ नातेवाईक म्हणतात म्हणून प्रकरण साेडून दिले. ज्या घरात मृतदेह हाेता ते घर आतून बंद हाेते, या एवढ्या कारणावरून सबंधित व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाल्याचा कयास पाेलिसांनी लावला आहे. याबाबत अवधुतवाडीचे ठाणेदार नरेश रणधिर यांच्याशी मंगळवारी सायंकाळी संर्पक केला असता त्यांनी यात नातेवाईकांची काेणतीच तक्रार नसल्याने नाेंद घेतली नसल्याचे सांगितले. तर उपविभागीय पाेलिस अधिकारी दिनेश बैसाने यांनी घटनेची माहिती घेवून नेमका काय प्रकर आहे हे सांगताे, अशी प्रतिक्रिया ‘लाेकमत’ ला दिली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ