शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
4
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
5
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
6
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
7
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
8
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
9
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
10
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
11
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
12
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
13
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
14
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
15
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
16
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
17
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
18
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
19
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
20
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

कर्जमाफी नव्हे, ही कर्जवसुली!

By admin | Published: June 27, 2017 1:26 AM

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना दीड लाखावरील रक्कम आधी स्वत: भरावी लागणार आहे.

देवानंद पवार : शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचा आक्षेपलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना दीड लाखावरील रक्कम आधी स्वत: भरावी लागणार आहे. त्यामुळे ही कर्जमाफी नसून कर्जवसुलीचा सरकारचा नवा फंडा आहे, अशी टीका शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केली आहे.एकाच गोष्टीसाठी सरकारने एकाच महिन्यात तीन वेळा वेगवेगळ्या घोषणा करण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे, असेही पवार यांनी प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे. दोन जूनच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी ३१ आॅक्टोबरपर्यंत करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यावर संतप्त शेतकऱ्यांनी राज्यभरात आंदोलन केल्यामुळे पुन्हा तातडीने दहा हजारांचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. यात शंभर टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. ३० जून २०१६ ही मुदत ठेवण्याऐवजी ३१ मार्च २०१७ अशी मुदत ठेवल्याशिवाय विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. एखाद्या शेतकऱ्याकडे तीन लाखाचे कर्ज असेल तर त्याने दीड लाख बँकेत भरल्याशिवाय त्याला उर्वरित दीड लाखाची कर्जमाफी मिळणार नाही. त्यामुळे सरकारची घोषणा म्हणजे, लबाडाचे आवतन आहे. जेवल्याशिवाय खरे नाही. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जीआर पाहिल्याशिवाय या घोषणेचे स्वागत करू नये, असेही देवानंद पवार म्हणाले.