शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

मोफत निवड होऊनही शाळेत विद्यार्थी ॲडमिशन घेईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:26 AM

यवतमाळ : कोरोनामुळे शिक्षणाकडे खुद्द पालकांचेही दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच आरटीईअंतर्गत राखीव जागांवर निवड होऊनही ५० टक्के पालकांनी १० ...

यवतमाळ : कोरोनामुळे शिक्षणाकडे खुद्द पालकांचेही दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच आरटीईअंतर्गत राखीव जागांवर निवड होऊनही ५० टक्के पालकांनी १० जुलै ही अंतिम मुदत उलटल्यावरही आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून घेतला नाही. जिल्ह्यातील आरटीईअंतर्गत राखीव असलेल्या १,२७५ जागांपैकी आतापर्यंत केवळ ८२१ जागांवर प्रवेश झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता आता शासनाने प्रवेश घेण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आधीच आरटीईच्या २५ टक्के जागा गरीब विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी पडतात. त्यातही निवड झाल्यावर दुर्लक्ष केले जात आहे.

कोट

यावर्षी कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे वारंवार मुदतवाढही द्यावी लागत आहे. कोरोनामुळे शाळाच बंद असल्याने अनेक पालक आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करण्यासाठी शाळेशी संपर्क साधू शकले नाही. आता मात्र शाळांमध्ये शिक्षक व अन्य कर्मचारी उपस्थित राहत आहेत. त्यामुळे पालकांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.

- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

तालुकानिहाय शाळा आणि जागा

तालुका शाळा जागा शिल्लक जागा

आर्णी १६ ०४ ३०

बाभूळगाव ०५ १९ ०५

दारव्हा ०७ १० १०

दिग्रस १० १६३ ३३

घाटंजी ०८ ३३ ३३

कळंब ०८ २८ १९

महागाव १३ ८० ०५

मारेगाव ०७ २३ १०

नेर ०६ ३५ १४

पांढरकवडा १५ ५९ १०

पुसद १६ १०६ ४१

राळेगाव ०७ ३२ ११

उमरखेड १८ १३२ ३०

वणी २१ १२३ ५३

यवतमाळ ४० २५७ ६७

झरी ०५ ११ १०