शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

शिक्षक भरती सुरू होऊनही ‘डीएड’ नापसंतच !

By अविनाश साबापुरे | Updated: June 28, 2024 19:03 IST

नऊ हजारांवर जागा राहणार रिक्त : ३० हजार जागांसाठी २१ हजार विद्यार्थ्यांचेच अर्ज

अविनाश साबापुरेयवतमाळ : गेल्या वर्षीपासून राज्यात शिक्षक भरती सुरू झाली आहे. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल, अशी अटकळ असताना, यंदाही विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यात उपलब्ध असलेल्या ३० हजार ८०७ जागांसाठी केवळ २१ हजार १०० विद्यार्थ्यांनीच अर्ज केले. त्यामुळे ९ हजार ७०७ जागा यंदाही रिक्तच राहणार आहेत.

बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ३ जूनपासून डीएडची प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी १८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने अर्ज भरण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अपेक्षित अर्ज आलेले नाहीत. विशेष म्हणजे, याकरिता बारावीत केवळ ४९.५ टक्के इतके जुजबी गुण असलेला विद्यार्थीही प्रवेश अर्ज भरण्यास पात्र होता, तरीही उपलब्ध जागांएवढेही अर्ज न आल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी डीएड अभ्यासक्रमाबाबत नापसंती दर्शविल्याचे चित्र आहे.

अशी आहे राज्यातील डीएडची स्थिती?जिल्हा : विद्यालय : जागा : आलेले अर्जयवतमाळ : १४ : ७२० : ६५१वाशिम : ०६ : ३५० : ३६३बुलढाणा : २४ : १४६० : ९६९अमरावती : ०९ : ४८७ : ४८६अकोला : ०९ : ४२७ : ३७५भंडारा : ११ : ५८७ : ४१८चंद्रपूर : ०२ : ९० : ३६३गडचिरोली : ०३ : २०० : ६६गोंदिया : १८ : ८९० : ६४६नागपूर : ३० : १४८२ : ५५८वर्धा : १० : ३९७ : १०६रत्नागिरी : ०४ : २७० : १३७सिंधुदुर्ग : ०५ : १८७ : ६०लातूर : २७ : १५९० : ११५९नांदेड : २० : ११९७ : ११२१धाराशिव : १६ : ७८० : ३४८संभाजीनगर : ३५ : २०५७ : ११४३बीड : ३० : १६२५ : १५२९हिंगोली : ०७ : ४६० : २९८जालना : १० : ६५० : ५४४परभणी : १२ : ६५० : ६७६कोल्हापूर : २० : १०२७ : ६४४सांगली : १५ : ६७७ : ४५४सातारा : १० : ४०० : २७६अहमदनगर : ३४ : १८३० : १०१८पुणे : २१ : १२६० : ५९६सोलापूर : २९ : १६९५ : १०१४धुळे : २१ : १२६० : ४६६जळगाव : १५ : ८५० : ६१९नंदुरबार : १० : ६५० : २८९नाशिक : २४ : ९६० : १८१७ठाणे : २६ : १४६० : ४६१रायगड : ०३ : १५० : ६८पालघर : ०६ : २८४ : ५४६मुंबई : ३३ : १७४८ : ८१६एकूण : ५६९ : ३०,८०७ : २१,१००

विद्यार्थ्यांचा कल थोडा बदलताना दिसत आहे. त्यामुळे कदाचित अर्ज कमी आले असतील. आता विद्यार्थ्यांना सिट अलाॅटमेंट होईल. सिट अलाॅटमेंट झाल्यानंतर शासनाच्या परवानगीने जेव्हा विशेष फेरी घेतली जाईल, तेव्हा कदाचित आणखी विद्यार्थ्यांचे अर्ज येतील.- डाॅ. माधुरी सावरकर, उपसंचालक, एससीईआरटी, पुणे

या जिल्ह्यातील विद्यालयांवर संकट गडदनाशिक वगळता जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये डीएडच्या उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या कमी आहे. त्यातल्या त्यात गडचिरोली, वर्धा, सिंधुदुर्ग, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, धुळे, नंदुरबार, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत उपलब्ध जागांच्या निम्मेही अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे येथील अनेक अध्यापक विद्यालयांवर बंदीचे संकट घोंगावत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणYavatmalयवतमाळ