शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिक्षण विभागातील पाच अधिकाऱ्यांचे अपंगत्व ‘डाउटफुल’

By अविनाश साबापुरे | Updated: June 20, 2024 23:43 IST

आयुक्तांनी दिले तपासणीचे आदेश : बोगस प्रमाणपत्राद्वारे बढती मिळविल्याचा संशय

यवतमाळ : बदली प्रक्रियेत बोगस अपंगत्वाचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांचा मुद्दा दरवर्षी ऐरणीवर येतो. परंतु, आता चक्क शिक्षण विभागातील पाच बड्या अधिकाऱ्यांनीच पदोन्नतीसाठी बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या अधिकाऱ्यांच्या अपंगत्वावर खुद्द शिक्षण आयुक्तालयालाच संशय असून आयुक्तांनी या पाचही अधिकाऱ्यांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य शासनाने २९ डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील १०५ अधिकाऱ्यांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गात पदोन्नती दिली. त्यामुळे हे अधिकारी जिल्हा तांत्रिक सेवा गट क श्रेणी-२ (शिक्षण) मधून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन शाखा) या संवर्गात पदोन्नत झाले. ४७६००-१५११०० या वेतनश्रेणीसाठी ते पात्र ठरले. परंतु, यातील पाच अधिकाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे पदोन्नती मिळविल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली. या दिव्यांग अधिकाऱ्यांची शहानिशा करुनच पुढील कार्यवाही करावी, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने थेट शिक्षण सचिवांकडे केली. त्यामुळे सूत्रे हलली. या अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींची तपासणी आयुक्त कार्यालयामार्फत होत असल्याने संघटनेची तक्रार सचिवांकडून आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचली. त्यामुळे आयुक्त कार्यालयाने १८ जून रोजी संबंधित शिक्षण उपसंचालकांना आदेश बजावून दिव्यांग अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. 

३० दिवसात अहवाल द्याया पाचही दिव्यांग अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि यूडीआयडी प्रमाणपत्रही नाही, असा आक्षेप आयुक्तालयाच्या आदेशात नमूद आहे. त्यामुळे त्यांनी पदोन्नतीसाठी सादर केलेल्या प्रमाणपत्राची शासकीय रुग्णालयाकडून पुनर्तपासणी करुण घ्यावी. त्याबाबतचा अहवाल ३० दिवसात सादर करावा, असे निर्देश शिक्षण आयुक्तालयाच्या प्रशासन अधिकारी रजनी रावडे यांनी शिक्षण उपसंचालकांना पाठविलेल्या आदेशात दिले आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि अमरावती शिक्षण उपसंचालकांसह माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांवर या अहवालाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहेत हे अधिकारी?बोगस अपंगत्वाचा लाभ घेतल्याचा आक्षेप असलेल्या पाच अधिकाऱ्यांपैकी एक जण बुलडाणा जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी आहेत. एक जण जालना जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी आहेत. तर तिसरे अधिकारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये तर चौथे अधिकारी लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये गटशिक्षणाधिकारी आहेत. तर एक महिला अधिकारी पुणे येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात सहायक सचिव म्हणून कार्यरत आहेत. या पाच जणांच्या प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित झाली आहे. पुनर्तपासणी अहवालानंतरच त्यांचा खरेखोटेपणा स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षण