शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

जनतेच्या तक्रारी बेदखल

By admin | Published: November 18, 2015 2:39 AM

वणी उपविभागातील जनतेला आता पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराची प्रतीक्षा लागली आहे.

जनता दरबाराची प्रतीक्षा : पाच महिन्यांचा पडला खंडवणी : वणी उपविभागातील जनतेला आता पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराची प्रतीक्षा लागली आहे. पहिला जनता दरबार झाल्यानंतर पाच महिन्याचा खंड पडल्याने पुन्हा नागरिकांकडे अनेक तक्रारी निर्माण झाल्या आहेत. या तक्रारींना संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. पालकमंत्री पुन्हा कधी जनता दरबार घेणार व आम्ही कधी आपली गाऱ्हाणी मांडतो असे जनतेला वाटू लागले आहे.वणी उपविभागातील अनेक विभागामध्ये जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. सामान्य नागरिक नियमात बसणारे काम करण्यासाठीही कोणत्याही कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयातील बाबुगीरीकडून तक्रारकर्त्यांनाच हुसकावून लावले जाते. मात्र वशिल्याने तात्काळ प्रतिसाद मिळतो. असा अनुभव अनेकांना आला आहे. जनतेची बाबुगीरीच्या जाचातून मुक्तता व्हावी म्हणून पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी जुलै महिन्यात वणी उपविभागीय स्तरावर जनता दरबार घेतला होता. त्यावेळी वणी, मारेगाव व झरी तालुक्यातून अक्षरश: तक्रारींचा पाऊस पडला होता. सतत आठ तास बसूनही संपूर्ण तक्रारीचा निपटारा पालकमंत्र्यांना करता आला नव्हता. मात्र अनेक तक्रारीवर संबंधित अधिकाऱ्याने सकारात्मक उत्तरे दिल्याने तक्रारकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दुसरा जनता दरबार आॅगस्ट महिन्यात घेण्यात येईल. त्यावेळेपर्यंत पहिल्या जनता दरबारातील सर्व तक्रारींचा निपटारा व्हायला पाहिजे, अशी तंबी त्यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती. नागरिकांच्या तक्रारीवर काय निर्णय घेण्यात आला. याचे लेखी उत्तर तक्रारकर्त्याला कळविण्याच्या सूचनाही त्यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक तक्रारकर्त्यांना अजूनही त्यांच्या तक्रारीचे काय झाले, याची माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यावेळी आपली वेळ मारून नेली तर नाही ना, असे अनेकांना वाटू लागले आहे. दुसऱ्या दरबारात या अधिकाऱ्यांची पोलखोल होणार, असे जनतेला वाटत होते. मात्र पाच महिने लोटूनही दुसरा जनता दरबार घेण्यात आलाच नाही. त्यामुळे जनतेची घोर निराशा झाली असून आता जनतेला दुसऱ्या जनता दरबाराची प्रतीक्षा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)