शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलानेच पित्यावर घातले चाकूने ३० घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 6:03 PM

मनात राग असलेला त्यांचा लहान मुलगा हरिदासने झोपेतच पित्यावर चाकूने वार केले. एकदा नव्हे, तर तब्बल ३० वेळा स्वत:च्या वडिलांचे शरीर भोसकून काढले.

ठळक मुद्देखैरी येथील घटना : शेतीच्या वादातून केला खून

यवतमाळ : जन्मदात्या पित्यासोबत शेतीच्या वाटणीवरून वाद झाला. याचा राग मनात धरून सर्वात लहान मुलाने चौकीदारी करीत असलेल्या पित्यावर मंगळवारी रात्री चाकूने ३० घाव घातले. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला. ही मन हेलावणारी घटना कळंब तालुक्यातील खैरी येथे घडली.

भीमराव सोनबा घोडाम (६५) असे मृताचे नाव आहे. भीमराव यांना तीन मुले आहेत. थोडीबहुत शेती आहे. या शेतीच्या हिस्सेवाटणीवरूनच घरात कुरबुर सुरू होती. जिवंत असेपर्यंत शेतीची वाटणी होऊ देणार नाही, अशी भूमिका घोडाम यांची होती. ते खैरी येथील तलावाच्या बांधकामावर चौकीदार म्हणून काम करीत होते. नेहमीप्रमाणे रात्री ते साइटवर गेले. मनात राग असलेला त्यांचा लहान मुलगा हरिदास भीमराव घोडाम (२६) याने झोपेतच पित्यावर चाकूने वार केले. एकदा नव्हे, तर तब्बल ३० वेळा स्वत:च्या वडिलांचे शरीर भोसकून काढले. खुनाची घटना सकाळी उघड झाल्यानंतर कळंब पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक अभय चौथनकर पथकासह घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळावरची स्थिती पाहून खुनाचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातच घरगुती शेतीचा वाद असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी चौकशी केली. संशयित हरिदासला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी रुख्मा भीमराव घोडाम यांच्या तक्रारीवरून म्हणजेच आईने दिलेल्या तक्रारीवरून मुलाविरोधात कलम ३०२ भादंविनुसार कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूArrestअटकPoliceपोलिसYavatmalयवतमाळ