शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत कर्ज वाटप करा

By admin | Published: May 29, 2016 2:35 AM

तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांनी १५ जूनपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, असे न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल,

किशोर तिवारी : उमरखेड पंचायत समितीमधील बैठकीत फौजदारी कारवाईची तंबीउमरखेड : तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांनी १५ जूनपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, असे न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला. पीक कर्ज वाटपासंदर्भात पंचायत समितीच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी तिवारी बोलत होते. बैठकीला आमदार राजेंद्र नजरधने, तहसीलदार भगवान कांबळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी तसेच सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बँकेने केलेल्या कर्ज वाटपाच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. बँकांनी खूप कमी प्रमाणात कर्ज वाटप केल्याचे यावेळी उघड झाले. काही शेतकरी तर गेल्या अनेक दिवसांपासून पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहे. तरीही त्यांना कर्ज मिळाले नाही, अशी अनेक प्रकरणे पुढे आली. त्यामुळे किशोर तिवारी चांगलेच भडकले. त्यांनी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कर्ज पुरवठा करणे हे बँकेचे कर्तव्य असून त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतली आहे. असे असतानाही तुम्ही कर्ज वाटप का करीत नाही, अशा शब्दात तिवारी यांनी बँक प्रतिनिधींची कानउघाडणी केली. उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत कर्ज पुरवठा झालाच पाहिजे, अन्यथा फौजदारी कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला बँकेचे जे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित नसतील त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याचे आदेश तहसीलदार भगवान कांबळे यांंना तिवारी यांनी दिले. फौजदारी कारवाई करण्याच्या इशाऱ्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. मात्र तिवारी यांचा इशारा प्रत्यक्षात उतरणार का हे १५ जूननंतरच स्पष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)