शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

यवतमाळ शहराला दूषित पाणीपुरवठा

By admin | Published: January 13, 2016 2:58 AM

शहराला होत असलेला पाणीपुरवठा दूषित असल्याची धक्कादायक बाब आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून पुढे आली आहे.

प्रयोगशाळेचा अहवाल : नगरपरिषदेचे बोट प्राधिकरणाकडेसुरेंद्र राऊत यवतमाळ शहराला होत असलेला पाणीपुरवठा दूषित असल्याची धक्कादायक बाब आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून पुढे आली आहे. नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यापैकी १७ टक्के नमुने दूषित आढळून आले आहे. यामुळे यवतमाळ शहरातील सव्वालाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवित जबाबदारी झटकली आहे.यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात शहरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७ टक्के नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा अहवाल आरोग्य प्रयोगशाळेने आरोग्य सेवा संचालनालयाकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे १० टक्के पेक्षा अधिक पाणी नमुने दूषित निघाल्यास ते मानवी आरोग्यास घातक मानले जातात. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात घेतलेले नमुने दूषित निघाले आहे. यावरून पावसाळ्यातील पाण्याची गुणवत्ता काय असेल याची कल्पना येते. शहराअंतर्गत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी गटारामध्येच नळाचे वॉल आहे. पाणी सोडताना सर्व प्रथम हवेसोबत गटारातील पाणी पाईपमध्ये शिरते. यामुळेच नळाचे पाणी दूषित येत आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात, असे पत्र आरोग्य सेवा उपसंचालक सुभाष कांबळे यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांंना दिले आहे. आता यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नळातून दूषित पाणीपुरवठा येत असल्याच्या अनेक तक्रारी नगर परिषदेत येतात. मात्र तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना थेट जीवन प्राधिकरणाचा रस्ता दाखविला जातो. नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी नगर परिषदेची असताना टोलवाटोलवी केली जाते. एकीकडे शहर स्वच्छतेचे नियोजन करणारी नगर परिषद थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.