शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

जिल्ह्याच्या आमदारांनी घेतला कोरोनाचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 5:00 AM

खरीप हंगामासाठी बियाणे व पीक कर्जाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीतील अहवाल आयुक्त व मंत्रालय स्तरावर पाठविला जातो. यातून खरिपाचे परिपूर्ण नियोजन केले जाते. अशा महत्वपूर्ण बैठकीला सर्वच विधानसभा व विधान परिषद आमदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देखरीप आढावा बैठक, पालकमंत्र्यांसह चारच आमदार उपस्थितीत, आठ जणांची पाठ

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या नियोजनाची आढावा बैठक पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडली. या बैठकीला बहुतांश आमदारांनी दांडी मारली. आर्णीचे विधानसभा व विधान परिषद आमदार या बैठकीला उपस्थित होते. अतिशय महत्वाच्या बैठकीकडे आमदारांनी पाठ का फिरविली याचे कोडे आहे.खरीप हंगामासाठी बियाणे व पीक कर्जाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीतील अहवाल आयुक्त व मंत्रालय स्तरावर पाठविला जातो. यातून खरिपाचे परिपूर्ण नियोजन केले जाते. अशा महत्वपूर्ण बैठकीला सर्वच विधानसभा व विधान परिषद आमदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. जेणे करून त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी, खते, बियाण्यांची उपलब्धता, पीक कर्जाची स्थिती याची माहिती या बैठकीच्या माध्यमातून वरिष्ठांकडे पाठविणे शक्य होते. जनतेचा कैवारी असल्याचा आव आणणारे लोकप्रतिनिधीच बैठकींना गैरहजर राहून शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते.जिल्ह्यात विधानसभेचे सात तर विधान परिषदेचे पाच आमदार आहेत. यापैकी केवळ खासदार सुरेश धानोरकर, खासदार हेमंत पाटील, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार ख्वाजा बेग, आमदार डॉ. संदीप धुर्वे व पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते. विधानसभेच्या सात आमदारांनी सहा जण गैरहजर होते. या बैठकीत आमदार डॉ.संदीप धुर्वे यांनी घाटंजी व आर्णी तालुक्यातील दुष्काळी मदतीचा मुद्दा उपस्थित केला. २०१८-१९ या वर्षात दुष्काळग्रस्त भागात शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. ५० टक्के पैसेवारी असलेल्या सात तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. या मदतीचे फाईल बाहेर येताच धक्कादायक माहिती मिळाली. आर्णी, दिग्रस, नेर, पुसद, घाटंजी, वणी, झरीजामणी या तालुक्यांना मदतीचे २१२ कोटी ४३ लाख वितरित झाले नसल्याचा प्रकार उजेडात आला. आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ही गंभीरबाब प्रशासनाच्या लक्षात आली. यासाठी विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही जिल्हाधिकाºयांनी बैठकीत सांगितले.कृषी विज्ञान केंद्राच्या उपयोगितेवर प्रश्नखरिपाच्या आढावा बैठकीत जिल्ह्यात असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या उपयोगितेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. इतक्या वर्षाच्या कालावधीत या विज्ञान केंद्राकडून कोणत्या शिफारसी, संशोधन शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्या आहेत. या शिफारसी व संशोधनाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला याची माहिती आमदारांनी बैठकीत मागितली. प्रशासनाकडून यासाठी वेळ घेण्यात आला आहे.कापूस संशोधन केंद्र नेमके कुणासाठी ?कापूस संशोधन केंद्र असूनसुद्धा त्याचा शेतकऱ्यांना कोणताच फायदा झालेला नाही. इतकी संकटे कापसाच्या पिकावर येत आहे. त्याच्या नियोजनासाठी कोणता उपाय या संशोधन केंद्राकडून देण्यात आला, या हिशेब खरीपच्या बैठकीत आमदारांनी मागितला.

टॅग्स :MLAआमदारcorona virusकोरोना वायरस बातम्या