शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

जिल्ह्यात वर्षभरात सहा हजार गंभीर गुन्ह्यांची नोंद

By admin | Published: December 26, 2015 3:18 AM

मावळत्या वर्षात जिल्ह्याभरामध्ये तब्बल सहा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे आहेत.

शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे : पोलीस पाटलाचा खून, यवतमाळातील तिहेरी हत्याकांडही गाजलेयवतमाळ : मावळत्या वर्षात जिल्ह्याभरामध्ये तब्बल सहा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. जिल्ह्यातील यावली इजारा येथील पोलीस पाटलाचा दारूविके्रत्यांनी केलेला खून आणि नवरात्र संपताच यवतमाळ शहरात घडलेले तिहेरी हत्याकांड सर्वसामान्यांचा थरकाप उडविणारे होते. शरीर दुखापतीच्या गुन्ह्यांमध्ये विभागात आघाडीवर असलेले शहर म्हणून यवतमाळची नोंद आहे. येथे संघटीत गुन्हेगारी विशेष सक्रिय नसली तरी, सातत्याने खुनांच्या घटना घडतात. वर्षभरात ७० खून झाले आहेत. ६६ जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. बलात्काराच्या ९२ घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील यावली इजारा येथे दारूबंदीसाठी पुढाकार घेणारे पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांचा दारू विक्रेत्यांनी खून केला होता. या घटनेने संपूर्ण राज्यातच खळबळ निर्माण झाली. त्यानंतर जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात दारूबंदीची मागणी पुढे आली. घाटंजी तालुक्यातील क्रुरकर्मा मामाला नात्यातील अल्पवयीन भाचीवर बलात्कार व खुनाच्या आरोपात शत्रुघ्न मेश्राम याला दुहेरी फाशीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली. विशेष म्हणजे हाच निकाला उच्च न्यायालयानेही कायम ठेवला. त्यानंतर गणपती उत्सवाच्या काळात यवतमाळ शहरात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना घडल्या. पत्नीनेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केला. तर कुख्यात असलेल्या सलिम इक्काचा त्याच्याच साथिदारांनी दगडाने ठेचून खून केला. यापूर्वी देवीनगरातील विद्यार्थिनीला भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून भोसकण्यात आले. तिचा रुग्णालयात दुर्दवी अंत झाला. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनांनी जिल्हा हादरला. पोलीस यंत्रणेने गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये तत्परता दाखविली आहे. डिटेक्शनची टक्केवारीही ७७ टक्के इतकी आहे. झालेल्या पाच हजार ९७१ गुन्ह्यांपैकी चार हजार ६१४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची संख्याही एक हजार १७३ ने घटली आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत सात हजार १४४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. असे असले तरी खुनाच्या गुन्ह्यांत मात्र वाढ झाली आहे. दुचाकी चोरींचे ३१ गुन्हे, नवविवाहितांच्या आत्महत्यात १३ ने वाढ, इतर आत्महत्या, निष्काळजीपणे वाहन चालविण्याचे प्रकार या वर्षात वाढले आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवरच्या हल्ल्यात घट झाली असून, वर्षभऱ्यात केवळ ११४ प्रकरणे पोलिसांत दाखल आहेत. इतर गुन्ह्यातही घट झाली आहे. सरासरी २०१४ च्या तुलनेत २०१५मध्ये गुन्हेगारीत किंचीत का होईना घट झाल्याचे दिसून येते. मात्र पोलिसांनी खुनासारख्या घटना व जबरी चोरी थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. हे सरत्या वर्षातील आकडेवारीवरून दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)