शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

५६ आरोपींना जामीन देऊ नका; एसआयटीचा अहवाल

By सुरेंद्र राऊत | Updated: October 10, 2024 16:53 IST

महिला बॅंक अपहार : ८० आरोपींची तात्पुरत्या जामिनासाठी धाव

यवतमाळ : बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात २०६ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहे. जवळपास दोन महिने लोटूनही यात केवळ सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेसह विशेष तपास पथक यावर काम करीत आहे. तात्पुरता जामीन (अंतरिम) मिळावा यासाठी ८० आरोपींनी यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहे. यावर न्यायालयाने तपास पथकाला से मागितला आहे. आतापर्यंत ५६ आरोपींच्या बाबत एसआयटीने से दिला आहे. 

संगनमताने बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेत पैसा गुंतविणाऱ्या ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली. अनेक बोगस प्रकरणे करून २४२ कोटींची रक्कम हडपली. या अफरातफरीत बॅंकेतील अधिकारी, संचालक, पदाधिकारी आणि काही कर्जदारांचाही समावेश आहे. मूल्यांकनकार व आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचा ठपका आहे. यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून विशेष तपास पथकाकडे देण्यात आला. या पथकात मर्यादित मनुष्यबळ व त्यातही त्यांच्यावर विविध प्रकारच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात येते. यामुळे हा महत्वपूर्ण तपास अतिशय संथगतीने सुरू आहे. या अपहारात अनेक सेवानिवृत्तांची जीवनभराची कमाई बुडाली आहे. काही पतसंस्थांनीसुद्धा बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेत गुंतवणूक केली होती. त्या पतसंस्था आज अडचणीत आल्या आहेत. तेथील ठेवीदारही केलेल्या गुंतवणुकीबाबत चिंताग्रस्त आहे. 

दिवसाढवळ्या संगनमत करून अडीच अब्ज रुपयावर डल्ला मारण्यात आला. आता पोलिस तपास पूर्ण होऊन या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा होईल, आरोपींची संपत्ती जप्त करून त्याचा लिलाव करीत बुडालेली ठेव परत मिळेल, अशी आशा येथील ठेवीदारांना लागली आहे. 

या गंभीर प्रकरणात अजूनही तपासाला अपेक्षित गती मिळालेली नाही. सात आरोपींना अटक करण्यात आली. ज्यामध्ये सुजाता महाजन, विलास महाजन या दाम्पत्यासह इतर पाच जणांचा सहभाग आहे. हा तपास गतिमान करून प्रकरण लवकरात लवकर न्याय प्रविष्ठ करावे, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे. 

विशेष पथकाला तपासाचा भार का ?एखाद्या मोठ्या अपहाराच्या, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले जाते. या पथकाकडे इतर दुसरे कोणतेच काम देणे अपेक्षित नाही. असे असतानाही या विशेष पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंदोबस्तात का गुंतविले जाते असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा परिणाम गुन्ह्याच्या तपासावर होताना दिसत आहे. आरोपी राजरोसपणे गावात फिरत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीYavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी