शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

लॉकडाऊन नकोच, गरिबांना जगू द्या हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:41 AM

घाटंजी : कोरोनाशी लढताना नियम कठीण करा; पण लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका येथील सामान्यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी तहसीलदारांमार्फत ...

घाटंजी : कोरोनाशी लढताना नियम कठीण करा; पण लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका येथील सामान्यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, कोरोनासोबत आपल्याला जगावे लागेल. एक वर्षापासून अनेक क्षेत्रांतील व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांच्या जगण्याची अगोदर सोय करा आणि मग लॉकडाऊन करा, अशी मागणी आहे.

काही प्रमाणात लॉकडाऊन पाहिजे असे म्हणणारे आहेत. ते शासकीय कर्मचारी किंवा गर्भश्रीमंत आहेत. त्यांचा विचार करू नका. केवळ जे उपाशी आहेत, त्यांचा विचार करा. नियम कितीही कठोर असू द्या. जनता त्याचे पालन करेल. मात्र, लॉकडाऊन नकोच, अशी त्यांची भूमिका आहे. संपूर्ण भारतात अशी अनेक कुटुंबे आहेत, की त्यांच्या घरात एकच कमविता आहे. बाकीचे त्याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊनचा निर्णय मागे घेऊन, त्याऐवजी आठवड्यातून चार दिवस व्यवसाय करण्याची सूट द्यावी आणि तीन दिवस लॉकडाऊन करावा, अशी मागणी करण्यात आली. लॉकडाऊन कायम राहिल्यास लोक उपासमारीमुळे आत्महत्या करतील. त्यामुळे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी बारकाईने विचार करावा, अशी मागणी जितेंद्र विलास जुनघरे व इतरांनी निवेदनातून केली आहे.