शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शक्ती कायद्याचा मसुदा केंद्रात धूळखात ! युती सरकारकडून पाठपुरावा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:12 IST

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या : गुन्हेगारांना पाठबळ

यवतमाळ : महिला-मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी गृहमंत्री असताना शक्ती कायद्याचा मसुदा तयार केला. मागील चार वर्षांपासून तो केंद्राकडे पडून आहे. युती सरकारकडून कोणताच पाठपुरावा केला जात नाही, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून यवतमाळात केला.

गुन्हेगारांना पाठबळराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी विदर्भात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री अनिल देशमुख दौरा करत आहेत. या अनुषंगाने त्यांनी गुरुवारी यवतमाळमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांपुढे राज्यातील एकूणची स्थिती मांडत सरकारच्या धोरणावर संताप व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम, बाबासाहेब गाडे पाटील, अशोक घारफळकर, अजहर फारूखी, भावना लेडे उपस्थित होते.

संरक्षणातून पसारछत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, माँ जिजाऊ यांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीच्या घराला पोलिस संरक्षण दिले जाते. पोलिस संरक्षणातूनच ही व्यक्ती पसार होते. दोन समाजात वाद निर्माण होईल, अशी वक्तव्य राज्यातील मंत्री सातत्याने करत आहेत.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या

  • शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. इतकेच नव्हे तर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा केली.
  • यापैकी एकाचीही पूर्तता केली नाही. शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. एकही हमीभाव केंद्र सुरू नसल्याने शेतमाल पडलेल्या दरात विकावा लागत आहे.
  • वर्षभरात २ हजार ७८७3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याकडे सरकार लक्ष देत नाही. लाडकी बहीण योजनेतही नवे निकष लावून ५० लाख लाभार्थी महिलांची नावे कमी केली आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, आतापर्यंत २ हजार ४०७ वेळा पोलिसांवर हल्ले झाले आहेत.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ