शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

चोरउमरी येथे पुलाअभावी अपघाताचा धोका

By admin | Published: May 17, 2017 12:55 AM

पावसाळ्यात पूर, त्यानंतर चिखल आणि उन्हाळ्यात गोटाडीचा रस्ता यामुळे चोरउमरी येथे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव(देवी) : पावसाळ्यात पूर, त्यानंतर चिखल आणि उन्हाळ्यात गोटाडीचा रस्ता यामुळे चोरउमरी येथे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी पुलाची निर्मिती करावी, यासाठी गावकऱ्यांनी वारंवार दिलेल्या निवेदनाला केराची टोपली मिळाली आहे. लोकप्रतिनिधींना दिलेल्या निवेदनाची दखल केवळ ‘रेफर टू’पर्यंत घेतली जात आहे. याविषयी नागरिकांमध्ये रोष आहे. आसेगाव(देवी) ते मांगलादेवी मार्गावरील चोरउमरीजवळ असलेल्या नदीवर गेली ७० वर्षांपासून पूल बांधण्यात आलेला नाही. या मार्गावरून एसटी बसेस, खासगी वाहने, दुचाकी, बैलगाडी आदी प्रकारच्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. पावसाळ्यात मात्र नदीला पूर आल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होते. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नदीतून दगडावरून वाट काढावी लागते. दुचाकीस्वारांना तर उतरूनच मार्ग काढावा लागतो. वाहन कुठे घसरून पडेल याचा नेम नाही. सदर ठिकाणी पूल बांधण्यात यावा, या मागणीचे निवेदन आसेगाव(देवी) येथील लीना भूपेंद्र लुणावत यांनी २९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समाधान शिबिरात दिले होते. कळंब तहसीलदारांनी या निवेदनाची प्रत बाभूळगाव तहसीलदारांना पाठविली. तेथून पुढील कारवाईसाठी १७ एप्रिलच्या पत्रानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पत्र पाठविण्यात आले. दाखल झालेल्या तक्रारीवरून पाच महिन्यांचा कालावधी लोटला. प्रत्यक्षात कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.