शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

वाघांची संख्या वाढल्याने वनवर्तुळ तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:11 AM

पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे१८ ते २० बछडे : वन्यजीव-मानव संघर्ष पेटला, सहा महिन्यांत बछडे होणार आईपासून दूर

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. त्यातील काही बछडे हे टिपेश्वर अभयारण्यात वास्तव्याला आहेत.‘वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत’ असा दावा भलेही वनविभाग करीत असला तरी वनविभागाअंतर्गत येणाºया जंगलांलगत गावांची संख्या मोठी आहे. टिपेश्वर अभयारण्यापेक्षा बफर झोनमध्येच वाघांचा अधिवास अधिक असल्याची माहिती वनविभागातील सुत्राने दिली. गेल्या काही महिन्यात एका नरभक्षी वाघिणीने १४ जणांचा बळी घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये वन्यजीव व वनविभागाबद्दल प्रचंड रोष आहे. हा रोष कमी करण्यासाठी वनविभागाने राळेगाव परिसरात नरभक्षी वाघिणीला पकडण्यासाठी मोठी फिल्डींग लावली असली तरी अद्याप ती वाघिण वनविभागाच्या जाळ्यात अडकली नाही. तिच्यासोबत तिचे दोन बछडे व वाघ असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे केवळ वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची कसरत सुरू आहे. तिला पकडण्यासाठी मोठा लावाजमा उभा करण्यात आला आहे. असे असले तरी नरभक्षी वाघिण या लावाजम्याला सातत्याने गुंगारा देत आहे.पांढरकवडा वनविभागाअंतर्गत पांढरकवडासह राळेगाव, मारेगाव, झरी, घाटंजी, वणी, आदी तालुके येतात. टिपेश्वर अभयारण्यातील अन्नसाखळी तुटल्याने तृणभक्षी प्राणी या अभयारण्याबाहेर पडल्याचे सांगण्यात येते. वाघाचे खाद्य तृणभक्षी प्राणीच असल्याने या प्राण्यांच्यामागे वाघही जंगलाबाहेर पडलेत. त्यातून वाघ आणि मानव संघर्षाची ठिणगी पडली. सध्या पांढरकवडा वनविभागाअंतर्गत १८ ते २० बछडे असून येत्या काही महिन्यात ते मोठे होऊन आईपासून दूर होणार आहेत. त्यामुळे वनविभागाची चिंता आणखी वाढली आहे. जंगलाला लागून अनेक गावे असून या गावातील नागरिकांचा जंगलाशी संबंध येतो. झरी तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून अनेक लोकांची शेती थेट जंगलातच आहे. वाघाचे दर्शन झाल्यानंतर शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरतात. आता पुन्हा वाघांची संख्या वाढल्याने परिस्थिती धोकादायक बनण्याची भीती जंगलालगतच्या गावामधील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.वाघांची संख्या वाढत असली तरी पांढरकवडा वनविभागाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे वाघांच्या संख्येने कोणती अडचण निर्माण होईल असे वाटत नाही. ज्या दुर्दैवी घटना घडल्या, त्यातील ९० टक्के घटना जंगल भागातच घडल्या आहेत. वन्यजीवांसाठी जंगल क्षेत्र कमी पडते अथवा जास्त आहे, हा तांत्रिक मुद्दा असल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही.- संगीता कोकणे, आरएफओ, पांढरकवडा.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल