शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

वणीतील धूळ आणि धूर प्रदूषणाने मानवी जीवन धोक्यात; खाण बाधित क्षेत्रात गंभीर आजार बळावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 3:57 PM

उपाययोजनाच नाही

संतोष कुंडकर

वणी (यवतमाळ) : कोळसा उत्खनन आणि त्याच्या वाहतुकीमुळे वणी परिसरात धूळ प्रदूषणाचा प्रंचड प्रकोप पहायला मिळतो. यासोबत या भागात असलेल्या चुना भट्ट्यांच्या धुरांड्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे केवळ मानवी जीवनच नाही तर पशुधन आणि शेती व्यवसायदेखील धोक्यात आला आहे. असे असताना याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या भागातील मानवी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वणी तालुक्यातील गावांची संख्या १६२ आहे. मात्र, कोळसा खाणी व अन्य उद्योगांमुळे १०२ गावे बाधित झाली आहेत. या गावकऱ्यांना अनंत अडचणी, समस्यांचा सामना करावा लागत आहे. १२ कोळसा खाणी आहेत. या खाणीतील कोळसा उत्खनन आणि त्याची वाहतूक यामुळे धूळ प्रदूषणात मोठी भर पडत आहेत. मुळात धुळीचे व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी वेकोलिची असताना वेकोलि मात्र थातूरमातूर उपाययोजना करीत असल्याचे विदारक चित्र वणी तालुक्यात पहायला मिळते. धुळीचे व्यवस्थापन करण्यासाठी डस्ट अरेस्टरचा वापर करायला हवा. मात्र, ती यंत्रणाच वेकोलिकडे नाही. किंबहुना ती असेल तरी त्याचा वापर न करता धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ जलसिंचन केले जाते. कोळसा वाहतुकीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कोळशाची धूळ साचते. यावर पाणी मारल्यानंतर तेथे चिखल तयार होतो. त्यामुळे दुचाकींचे अपघात घडतात. रस्त्यावर पाणी मुरते. त्यातून रस्ते फुटतात.

हजाराे हेक्टर शेतजमीन बंजर

धूळ प्रदूषणामुळे कोळसा वाहतुकीच्या रस्त्यावरील हजारो हेक्टर शेतजमीन बंजर झाली आहे. या जमिनीची उत्पादन क्षमता घटली आहे. पिकांवर कोळशाची धूळ बसल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. त्यातून पिकांच्या उत्पादनात घट येते. दरवर्षीच या भागातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते. असे असताना बाधित शेतकऱ्यांना वेकोलिकडून नुकसानीचा मोबदला म्हणून एक छदामही मदत दिला जात नाही.

विविध आजारांची बाधा

धूळ प्रदूषणामुळे दमा, त्वचा रोग, पोटाचे विकार, दृष्टीदोष, बहिरेपणा या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. प्रदूषणाचा पशुधनावरदेखील परिणाम होत आहे. कोळसा वाहतुकीमुळे जनावरांच्या चाऱ्यावर धूळ बसते. पाळीव जनावरे मग हाच चारा खातात. त्यातून त्यांना वेगवेगळे आजार जडत आहेत.

प्रोसोपीस, ज्युलीफ्लोरा वनस्पती धोकादायक

कोळसा उत्खननानंतर खाणीतून निघणाऱ्या मातीचे अजस्र ढिगारे वणी तालुक्यात उभे करण्यात आले आहेत. नियमानुसार, या ढिगाऱ्यांवर हरित पट्टा तयार करण्यासाठी कडुनिंब, सीसू, आवळा, आंबा, कदंब, जांभूळ, बेहडा, बदाम यासारखी झाडे लावणे अपेक्षित होते. मात्र, वेकोलिने अशा कोणत्याही झाडांची लागवड केल्याचे दिसून येत नाही. याउलट धोकादायक असलेली प्रोसोपीस, ज्युलीफ्लोरा ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर खाण क्षेत्रात उगवली आहे. या घनदाट वनस्पतींमुळे वणी परिसरात वाघांचा संचार वाढला आहे. सोबतच इतरही हिंस्र जनावरांची संख्या वाढीस लागली आहे.

चुनाभट्ट्यांच्या धुराने गावकरी बेजार

वणीपासून अगदी जवळ असलेल्या राजूर कॉलरी येथे ५० पेक्षा अधिक चुनाभट्ट्या आहेत. यापैकी आता १२ चुनाभट्ट्या सुरू आहेत. या चुनाभट्ट्याच्या धुरांड्यातून निघणाऱ्या धुरामुळे केवळ राजूर कॉलरी येथीलच नाही तर अवतीभोवतीची आठ ते १० गावे बेजार आहेत. या नागरिकांना २४ तास या धुराचा सामना करावा लागत आहे.

कोळशाची वाहतूक होणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. खाणीलगतची गावेही प्रदूषणाने बेजार आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यासाठी आपत्तीच्या धर्तीवर वेकोलिने धोरण ठरवायला हवे. खाण बाधित क्षेत्रातील नागरिकांची नियमितपणे आरोग्य तपासणी करून त्यांच्या उपचाराचा खर्चदेखील वेकोलिने सीएसआर फंडातून करायला हवा.

विजय पिदूरकर, माजी सदस्य खनिज विकास प्रतिष्ठान.

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणYavatmalयवतमाळ