शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प

By admin | Published: December 31, 2015 2:41 AM

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटना सरसावली आहे.

भारतीय जैन संघटना : जिल्ह्यातून ५० विद्यार्थ्यांची होणार निवडयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटना सरसावली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अशा ५० मुलांची निवड करून त्यांच्या पाचवी ते बारावी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही संघटना घेणार आहे. त्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात भारतीय जैन संघटनेचे गेल्या दोन दशकांपासून अव्याहत कार्य सुरू आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या नेतृत्वात पुण्यातील वाघोली येथे सुसज्ज असा शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. खिल्लारीमध्ये भूकंप झाला त्यावेळी तेथील आपद्ग्रस्त कुटुंबातील तब्बल १२०० मुलांची जबाबदारी या संघटनेने घेतली. त्यांना वाघोलीच्या केंद्रात ठेवून त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मेळघाटातही आदिवासी मुलांना अशाच प्रकारे मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न भारतीय जैन संघटनेतर्फे करण्यात आले.कोणत्या विद्यार्थ्यांची होणार निवड ?भारतीय जैन संघटना पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची या प्रकल्पासाठी निवड करणार आहे. ज्या शेतकरी कुटुंबात २०१४ व २०१५ या वर्षात वडीलाने किंवा आजोबाने आत्महत्या केली आहे, अशा कुटुंबातील मुलांची व मुलींची निवड केली जाणार आहे. वाघोली, पुणे येथे शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पा सोबतच भारतीय जैन संघटनेचे सर्व सोयीयुक्त वसतिगृह आहे. तेथे या मुलांच्या राहण्याची-जेवणाची, शैक्षणिक साहित्य, कपड्यांची, आरोग्याची तसेच मुलांचा सर्वंकक्ष विकास व्हावा, यासाठी सर्व व्यवस्था असतील. तर शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात अत्यंत आल्हाददायक वातावरणात त्यांचे शिक्षण पूर्ण केले जाणार आहे.