शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शेतकऱ्याच्या अपंगत्वाला वीज कंपनीच कारणीभूत; कंपनीला द्यावी लागणार आठ लाखांची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:56 IST

Yavatmal : वीज कंपनीला यवतमाळ ग्राहक आयोगाचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतातील वीज खांबात संचारलेल्या प्रवाहामुळे जखमी झालेल्या शेतकऱ्यास ८५ टक्के अपंगत्व आले. वीज कंपनीचा दुर्लक्षितपणाच शेतकऱ्याच्या अपघाताला कारणीभूत असल्याचे सिद्ध झाल्याने ग्राहक आयोगाने कंपनीला आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

उत्तरवाढोणा (ता. नेर) येथील राजू केशवराव नरोटे हे शेतात डवरणी करत असताना हा अपघात झाला. वीज खांबातील प्रवाहामुळे त्यांचा डावा हात कोपरापासून कापावा लागला, तसेच एक पाय भाजला गेला. त्यांनी वीज कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाने विद्युत कंपनीचा हलगर्जीपणा सिद्ध होत असल्याचे मान्य करून भरपाईचा देण्याचा आदेश दिला. 

वीज निरीक्षकाचा अहवाल धुडकावला

  • घटनेनंतर वीज निरीक्षकाने आपला अहवाल सादर केला होता. त्यामध्ये विद्युतीय कारणामुळे अपघात झाल्याचे स्पष्टपणे नमूद करताना शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, असे म्हटले होते. मात्र, वीज कंपनीने हा अहवाल धुडकावत भरपाई नाकारली होती.
  • विशेष म्हणजे, आयोगाने निकाल देताना विद्युत निरीक्षकांचा अभिप्राय महत्त्वपूर्ण ठरला. वीज कंपनीच्या यंत्रणेतील व्यक्तीने दिलेल्या अहवालावरही या प्रकरणात अविश्वास दाखविण्यात आला होता.

ग्राहक आयोगात धाववीज कंपनीकडून भरपाई मिळण्याची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने राजू नरोटे यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. राजू नरोटे यांची बाजू अॅड. प्रकाश शेळके यांनी मांडली. शेतातील वीज खांबाची देखभाल, दुरुस्ती योग्यरीत्या केली नसल्याने अपघात होऊन नरोटे यांना अपंगत्व आल्याचे आयोगाने नमूद करत त्यांच्या बाजूने निकाल दिला.

व्याजासह रक्कम द्यावीवीज कंपनीने राजू नरोटे यांना आठ लाख रुपये आठ टक्के व्याजासह द्यावे, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे. कायम अपंगत्व आल्याने आणि पुढील आयुष्यात येणाऱ्या उपचार खर्चाकरिता सर्वसमावेश म्हणून ही रक्कम देण्यात यावी, असे आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरी