शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

रिकाम्या सरकारी इमारती बनल्या गैरप्रकाराचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:18 PM

लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या काही सरकारी इमारतींचा वापर थांबला आहे. या इमारती आता गैरप्रकाराचा अड्डा बनल्या आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : नेर येथे मोकळे रान, शांतता व सुव्यवस्थेला धोका

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या काही सरकारी इमारतींचा वापर थांबला आहे. या इमारती आता गैरप्रकाराचा अड्डा बनल्या आहे. संध्याकाळनंतर त्याठिकाणी चालत असलेले प्रकार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिवाय शांतता व सुव्यवस्थेलाही धोका निर्माण होत आहे. तालुका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांसाठी रान मोकळे झाले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या इमारतींचा वापर संबंधितांकडून केला जात नाही. पंचायत समितीजवळ जुने शासकीय रुग्णालय होते. दहा वर्षांपूर्वी या रुग्णालयाचे नवीन वास्तूत स्थलांतर झाले. यानंतर काही वर्षेपर्यंत प्रसूती याशिवाय इतर रुग्णालयीन कामे या इमारतीमधून चालत होती. आता बेवारस पडून असलेली ही इमारत काही लोकांनी मौजमजेसाठी वापरणे सुरू केले आहे. काही प्रकरणात कारवाईसुद्धा पोलिसांकडून झाली आहे. इमारतीला दारे, खिडक्या असल्या तरी त्या लाऊन घेण्याची तसदी संबंधित प्रशासनाने कधीही घेतली नाही.अमरावती मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसाठी बांधलेले निवासस्थानही अडगळीत पडले आहे. भर वस्तीत ही वास्तू असतानाही अभियंता मुख्यालयी राहात नाही. या टुमदार इमारतीची दारे सताड उघडी आहेत. संध्याकाळच्यावेळी दारूड्यांकडून तसेच गांजा पिणाºयांकडून या इमारतीचा वापर केला जातो. अंधार पडल्यानंतर अनैतिक प्रकारही या ठिकाणाहून चालत असल्याची माहिती आहे. गर्दी वाढत असल्याने परिसातील लोकांसाठी हा प्रकार धोक्याचा ठरत आहे. कुणी हटकण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धाऊन येण्यापर्यंत मजल गेली आहे.या इमारतीचा वापर झाल्यास गैरकृत्य थांबून नागरिकांना सुरक्षितता मिळू शकते. किमान या इमारतीची देखभाल दुरुस्ती तरी नियमितपणे केली जावी, अशी या भागातील नागरिकांची अपेक्षा आहे.