शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

भारत उभा करावयाचा असेल तर जातीयवाद संपवा

By admin | Published: April 12, 2017 12:09 AM

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व देशभक्तीचे होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची सांगड भारतीय संविधानात घातली.

श्रीपाल सबनिस : पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे प्रबोधन पुष्प, श्रोत्यांचा प्रतिसाद पुसद : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व देशभक्तीचे होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची सांगड भारतीय संविधानात घातली. राज्यघटनेत सर्वांना स्वातंत्र्य आहे. बाबासाहेबांच्या कर्तृत्व व नेतृत्वामुळे संपूर्ण जग प्रभावीत झाले होते. बाबासाहेबांचा जन्म जरी भारतात झाला असला तरी त्यांच्या बौद्धीक विकास हा उदारमतवादी राष्ट्रांमध्ये झाला. धर्म हा न्याय देणारा व दु:खातून मुक्त करणारा असतो. मात्र हिंदू धर्माने बाबासाहेबांना छळले. भारत उभा करावयाचा असेल तर जातीयवाद संपला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.श्रीपाल सबनिस यांनी केले. पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे प्रबोधन पुष्प पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब जयंती उत्सव समितीच्यावतीने स्थानिक पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वानिमित्त आयोजित प्रबोधनातील ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी दीपक आसेगावकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.आशीष देशमुख, डॉ.भानुप्रकाश कदम, डॉ.उत्तम खांबाळकर, मिलिंद दहेकर, ललिता सबनिस, डॉ.राजेश गाढवे, गोवर्धन मोहिते, प्रमोद सोनटक्के आदींची उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी समितीचे मिलिंद हट्टेकर, महेश खडसे, अनिल हट्टेकर, प्रा.विलास भवरे, प्रा.महेश हंबर्डे, विलास खडसे, समाधान केवटे, रामदास कांबळे, मनोज खिराडे, साहेबराव गुजर, अशोक वाहुळे, भगवान हनवते, भारत अंभोरे, बाळासाहेब कांबळे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)