शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 5:00 AM

मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाचा कलंक सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । कान्हाळगाव(वाई) येथील ग्रामस्थ त्रस्त, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोयं परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष पूर्ण झालीत. तरीही मारेगाव तालुक्याच्या एका टोकावर असलेल्या कान्हाळगाव (वाई) या आदिवासीबहुल गावात अद्याप रस्ता पोहोचला नाही. त्यामुळे बाराही महिने मोठ्या यातना सहन करीत नागरिकांना ये-जा करावी लागते.मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाचा कलंक सहन करावा लागत आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७३ वर्षे पुर्ण झालीत. गावाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात.पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा विविध योजना आल्या तरी कान्हाळगाव मुख्य रस्त्याला जोडले गेले नाही. गावापासून चार किलोमीटर अंतरावरून दोन पक्के जिल्हा मार्ग आहेत. परंतु या मार्गाला जोडणारा गावातून रस्ता नाही. जिल्हा मार्गावर पोहोचण्यासाठी गावातून दोन रस्ते आहेत. परंतु हे रस्ते जाण्यास योग्य नसून या रस्त्यावर नाले आहे. पावसाळ्यात या नाल्याला पूर येऊन गावाचा संपर्क बरेचदा खंडीत होत असतो.गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. त्यापुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते. परंतु गावाला बारमाही रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यामुळे रोजगाराचे प्रमाण गावात कमी आहे.याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या, निवेदन दिले. परंतु आश्वासनापलीकडे ग्रामस्थांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र प्रशासनाविषयी तीव्र असंतोष दिसून येत आहे.निवडणुकीवर टाकला होता बहिष्काररस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वळविण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या, अनेकदा निवदने दिली. परंतु फक्त आश्वाशिवाय जनतेच्या काहीही पदरात पडले नाही. शेवटी गावकऱ्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुका मतदानावर बहिष्कार टाकला. परंतु याचाही प्रशासनावर काहीही परिणाम झाला नाही. आता बेमूदत उपोषणाला बसू, अशा इशारा कान्हळगावच्या नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.एकाकीपणाची भावनाआज सगळ्या गावात पक्के रस्ते पोहोचले. लोकांचे राहणीमान बदलले. प्रत्येक गावात वाहतुकीची साधने आली. मोटारसायकल आली, परंतु गावाला रस्ता नसल्याने गावात कोणत्याही सुविधा पोहोचल्या नाही. गावात जाण्यासाठी योग्य रस्ताच नसल्याने अधिकारी कर्मचारी येत नाही. गावात दोन शिक्षकी शाळा असून शिक्षक मिळत नाही. त्यामुळे गावकºयांत एकाकीपणाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सरपंच माया पेंदोर यांनी केली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास