शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

वृक्ष लागवडीवरील खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 9:34 PM

वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : वनाधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणारी देखभाल गेली कुठे ?

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने शासनाचा वन विभाग व पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून पर्यावरण दिनी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. तालुक्यातही विविध ठिकाणी वृक्ष लागवडीची तयारी करण्यात आली. मात्र लागवडीनंतर तेवढ्याच काळजीने देखभालीचे काम वन विभागाने केले नाही. परिणामी उमरखेड-ढणाकी, उमरखेड-पुसद रस्त्याच्या काठाने पावसाळ्यात लावण्यात आलेली झाडे आता दृष्टीस पडणे कठीण झाले आहे. या वृक्षांची आवश्यक ती देखभाल न झाल्याने जिवंत झाडांची संख्या बोटावर मोजण्याइतपच आहे. वन विभागानचे अनेक वरिष्ठ अधिकारी आत्तापर्यंत अनेकदा उमरखेडला आले. मात्र त्यांचेही या गंभीर समस्येकडे लक्ष गेले नाही.वन विभाग दरवर्षी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करते. त्याचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र त्याच प्रमाणात वृक्ष संगोपनाची काळजी ोतली जात नाही. वृक्षांच्या देखभालीवरही शासन कोट्यवधींचा खर्च करते. मात्र त्याची फलश्रृती काय, असा प्रश्न कायम आहे.उमरखेड तालुक्यात वन विभागाच्या वरिष्ठांनी वृक्ष लागवड आणि संगोपनाची पाहणी केल्यास भयावह सत्यता समोर येण्याची शक्यता आहे. वृक्ष जगले नाही. त्यामुळे लागवड केलेले वृक्ष कमकुवत होते काय, तयार करण्यात आलेले खड्डे बरोबर होते किंवा नाही, याची तपासणी होणे गरजेचे झाले आहे. सर्वच जर व्यवस्थित होते, तर लागवड केलेल्या ठिकाणचे वृक्ष मृत्तावस्थेत कसे, असा प्रश्न आहे. या सर्व प्रकारची जबाबदारी कोणाकडे होती, याचा शोध घेणे आवश्यक आहे.वन विभागाचा कारभार ‘रामभरोेसे’स्थानिक पातळीवर वन अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंगत एकोपा नाही. त्यामुळे येथील वन विभागाचा कारभार एकतर्फी आणि रामभरोसे सुरू आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने येथील अधिकारी, कर्मचारी सुस्तावले आहे. परिणामी लाखो रूपये खर्च करूनही वनसंपदा वाढण्याचे नाव घेत नाही. उलट लावलेली झाडेही जगविली जात नाही. लागवडीनंतर त्यांचे संगोपन केले जात नाही. याची प्रत्यक्षात पाहणी करून जनतेसमोर वास्तव येणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग