शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Published: January 09, 2016 2:59 AM

बळीराजा चेतना अभियान शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासोबतच त्यांच्यात मनोधर्य निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

यवतमाळ : बळीराजा चेतना अभियान शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासोबतच त्यांच्यात मनोधर्य निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. हे काम करतानाच कीर्तनकार, प्रवचनकार तथा सामाजिक संस्थांनी विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.बळीराजा चेतना अभियानांतर्गत जनजागृतीचे कार्यक्रम राबविणारे कीर्तनकार, प्रवचनकार, कलापथक, कलावंत, सामाजिक संस्था, कवी, साहित्यिक, नाट्यकलावंत, लेखक यांच्यासह उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची संयुक्त बैठक येथील बचत भवनात झाली. यावेळी ते बोलत होते.बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी दीपककुमार सिंगला, विकास माने, संदीप अपार, विधळे, चेतन गिरासे आदी उपस्थित होते. बळीराजा चेतना अभियान खऱ्या अर्थाने कीर्तनकार, प्रवचनकारांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे चांगले वातावरण जिल्ह्यात तयार झाले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कीर्तनकार, प्रवचनकारांचे कौतुक व केले. शासनाने स्वस्त दरात गहू व तांदुळ वितरणाची योजना सुरू केली आहे. जीवनदायी आरोग्य योजना, पिककर्ज योजना, जनधन योजना, श्रावणबाळ योजना यासह अनुदानाच्या आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना आहते. त्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी अभियानांतर्गत जिल्हाभर राबविल्या जात असलेल्या जनजागृती कार्यक्रमाची माहिती दिली.कीर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ठिकठिकाणी सादर करावयाच्या जनजागृती कार्यक्रमाचे नियोजनही यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)