शहरं
Join us  
Trending Stories
1
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
2
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
3
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
4
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
5
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
6
₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?
7
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?
8
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
9
Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!
10
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
11
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
13
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
14
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
15
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
17
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
18
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
19
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
20
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

फुलसावंगीचा शेतकरी मार्गदर्शन मेळावा ठरला फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:31 AM

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी रविवारी फुलसावंगी गाठले. भर उन्हात केवळ मर्जीतील दोन शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीत बोलावून बीज प्रक्रिया कशी करावी, घरच्या ...

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी रविवारी फुलसावंगी गाठले. भर उन्हात केवळ मर्जीतील दोन शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीत बोलावून बीज प्रक्रिया कशी करावी, घरच्या सोयाबीन पिकाची उगवण शक्ती कशी तपासावी, याची माहिती दिली. विशेष म्हणजे गावात १६ कृषी केंद्र आहे. कोणाचे गोदाम कुठे आहे, याची कृषी आधिकारी आणि त्या दुकानदारालाच माहिती आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी बियाणे, खत खरेदीची लगबग करीत आहे. मात्र, कृषी कार्यालयाकडून योग्य मार्गदर्शन होताना दिसत नाही.

काही दुकानदार कच्च्या बिलावर बंदी असलेले बियाणे विकत आहे. मागील वर्षी एका स्थानिक कृषी केंद्र चालकाचा बियाणे विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र, कृषी अधिकाऱ्यांनी त्याला वकिली सल्ला देऊन दुसरा परवाना त्याच्या भावाच्या नावाने मिळवून दिला. जिल्हा परिषद हायस्कूललगत एका अतिक्रमित जागेत सुरू असलेल्या कृषी केंद्राला परवाना दिलाच कसा, हा संशोधनाचा विषय आहे.

बॉक्स

शेतकरी मार्गदर्शनापासून वंचित

कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकरी मार्गदर्शनापासूनही वंचित आहे. शेतकरी बोगस बियाण्याला बळी पडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बेजबाबदार तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. कृषी केंद्रचालक बियाणे व रायसायनिक खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री करतात. पण कृषी केंद्रांवर कारवाई करण्याचे सौजन्य दाखवले जात नाही. काळी दौ. येथे भरारी पथकाने धाड टाकून सहा कृषी केंद्र चालकांना नोटीस बजावली, हे विशेष.