शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कणिस मान झुकवते अन् पाखरांची नजर चुकवते..! 

By अविनाश साबापुरे | Published: March 12, 2024 5:06 PM

रब्बी ज्वारीचा शेतकऱ्यांना आधार; विद्यापीठाचे वाण, विदर्भ-मराठवाड्यातील शिवारात प्रयोग यशस्वी.

अविनाश साबापुरे, यवतमाळ : मागणीपेक्षा पुरवठा कमी असूनही गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड कमी केली आहे. त्यामागे पाखरांकडून होणारा त्रास हे एक प्रमुख कारण आहे. परंतु, याच त्रासावर उतारा ठरणारे वाण आता शेतकऱ्यांना सापडले आहे. या ज्वारीची पूर्ण वाढ झालेले कणिस खाली झुकते. त्यामुळे पाखरांना त्यावर बसताच येत नाही. या रब्बी ज्वारीची लागवड करून यंदा विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी प्रगती साधली आहे.

ज्वारीचे पीक वाढल्यानंतर दाणेदार कणिस ताठ उभे राहते. त्यावर पाखरांचे थवेच्या थवे बसून बहुतांश दाणे फस्त करतात. ही समस्या निकाली काढण्यासाठी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘पीकेव्ही क्रांती-जी’ हे रब्बी ज्वारीचे वाण शोधले आहे. त्याला उमरखेडच्या भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानने प्रचाराची जोड दिली. क्रांती-जी या वाणासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषीमित्र अशोक वानखेडे यांनी गावोगावी फिरून ज्वारीचे पारंपरिक वाण गोळा केले. 

गेल्या आठ वर्षांपासून कृषी प्रतिष्ठानने त्याची आधी स्वत:च्या शेतात लागवड केली. त्याचे उत्तम ‘रिझल्ट’ जाणून घेतल्यानंतर आता त्यांनी हे बियाणे शेतकऱ्यांना वाटप करणे सुरू केले आहे. यंदा रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांनी विदर्भातील उमरखेड, आर्णी, महागाव या शिवारात तसेच मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर आदी शिवारात या बियाण्याचे वाटप केले. बियाणे दिलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्याची लागवड करवून घेतली. याच ज्वारीला आता ‘उमरखेडी ज्वारी’ म्हणून ओळखले जात आहे. 

कधी करावी लागवड?

खरिपातील उडीद, मूग, सोयाबीन काढल्यानंतर जमिनीची चांगली मशागत करून ही रब्बी ज्वारी लावावी. यंदाच्या रब्बीमध्ये २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान २५० शेतकऱ्यांनी ‘उमरखेडी ज्वारी’ची पेरणी केली होती. भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानने दिलेले हे बियाणे आता विदर्भ-मराठवाड्याच्या शिवारात बहरले आहे. दाणेदार कणसं वाऱ्यावर डोलत असले, तरी त्यावर एकाही पाखराचे बस्तान बसलेले नाही.

भाकर बनते कडक आणि रुचकर - 

‘उमरखेडी ज्वारी’चे कणिस खाली झुकलेले असते. त्यामुळे पाखरांचा त्रास अजिबात होत नाही. अवकाळी पाऊस झाला तरी कणसात पाणी न साचता निथळून जाते. दाणे टपोरे, रंग पांढुरका पिवळा चकचकीत असतो. या ज्वारीचे दाणे इतर बियाण्यापेक्षा कणखर असल्याने या ज्वारीची भाकर कडक आणि रुचकर बनते. ही ज्वारी अधिक दिवस साठवून ठेवली तरी खराब होत नाही. 

या बियाण्याला आता शेतकऱ्यांकडून मागणी वाढत आहे. येत्या रब्बी हंगामापूर्वी कृषी विद्यापीठाने, कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्यासाठी हंगामपूर्व नियोजन शेतकरीहिताचे होईल.- अशोक वानखेडे, अध्यक्ष, भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान, उमरखेड

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरी