शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:40 AM

फोटो के.एस. वर्मा राळेगाव : प्रदीर्घ काळानंतर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नवे संचालक आणि पदाधिकारी निवडून आले. नव्यांकडून ...

फोटो

के.एस. वर्मा

राळेगाव : प्रदीर्घ काळानंतर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नवे संचालक आणि पदाधिकारी निवडून आले. नव्यांकडून बँकेच्या ग्राहकांना अनेक अपेक्षा आहे.

ग्राम विविध कार्यकारी सोसायट्या वर्षानुवर्षे काही मोजके अपवाद वगळता, कर्जवाटप व कर्जवसुली हे एकमेव काम करीत आहे. संपूर्ण जिल्हाभर पसरलेल्या बँकेच्या या नेटवर्कच्या माध्यमातून आणखी काही ग्राहकसेवा व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बँकेने संपूर्ण जिल्हाभरातील लाखांवर ग्राहकांना, सभासदांना एटीएम कार्डचे वाटप केले आहे. राळेगाव तालुक्यात चार हजार भागधारक ग्राहकांना एटीएम कार्ड देण्यात आले आहे. त्याची २०० रुपये फी खात्यातून परस्पर वळती करण्यात आली, पण आजपर्यंत बँकेने स्वत:चे एकही एटीएम उघडलेले नाही. निदान बँकेच्या शाखा असलेल्या ठिकाणी तरी एटीएम सुरू करून ग्राहकांना ग्रामस्तरावर सेवा मिळणे अपेक्षित आहे.

अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी वरिष्ठ नागरिकांना घरपोच बँक सेवा देण्यास सुरुवात केली आहे. पोष्टमन गावात नागरिकांना घरपोच पैसे पोहोचवित आहे. सहकारी बँकेनेही सेवेत विस्तार करण्याची गरज आहे. ग्राहकांकरिता मदत सेवा केंद्र सुरू करणे काळाची गरज आहे.

नियमित कर्जफेड करणारे, कर्जमाफीचा लाभ मिळालेले व नवे सभासद या तीन वर्गांतील शेतकऱ्यात पीककर्ज मर्यादा वाढीत भेदभाव होत असल्याची ओरड आहे. त्यांच्याकडून कर्जवाटपात समानतेची अपेक्षा केली जात आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांना सुविधा हव्या

बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांना, ग्राहकांना बसण्यासाठी आरामदायी आसनव्यवस्था, पिण्याचे थंड पाणी, पंखे, कूलर, गर्दीच्या काळात उन्हापासून संरक्षणासाठी सावलीचे शेड आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन दिलासा देण्याची आवश्यकता आहे. राळेगाव या तालुका ठिकाणच्या बँकेत अनेक वर्षांपासून शेतकरी व ग्राहकांकरिता बसण्यासाठी सिमेंटचे बाकडे आहे. त्याच वेळी संचालकांच्या सुविधेच्या नावावर काही वर्षांपूर्वी आलिशान एसी विश्रामगृह बांधण्यात आलेले आहे.

बॉक्स

विस्तार करण्याची प्रतीक्षा

बँकेने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी व व्यवसाय वाढीसाठी गोडाऊन, वखारी व शीतगृहे बांधून सेवेत विस्तार करण्याची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर याच परंपरागत पीक पॅटर्नमध्ये वर्षानुवर्षे अडकले आहे. सिंचनाच्या सुविधेत लक्षणीय वाढ झाली असल्याने, नवीन, जादा उत्पादन व जादा नफा मिळवून देणाऱ्या पीक पॅटर्नची माहिती शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामापूर्वी प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाल्यास बँकेचीही प्रगती होऊ शकेल.