शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांनो बोगस खतापासून सावधान; सेंद्रीयच्या नावाने बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:14 IST

मिश्रखत आणि सेंद्रीय खताच्या नावावर बोगस खत शेतकऱ्यांवर थोपविले जात आहे.

ठळक मुद्देदरवाढीच्या सुमारास बोगस कारखाने उदयाला

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खताच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहे. यामुळे स्वस्त खत खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. हीच संधी हेरत बोगस कारखानदारांनी पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. असे खत थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहचत आहे. काही जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघड झाल्यानंतर कृषी आयुक्तालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मिश्रखत आणि सेंद्रीय खताच्या नावावर बोगस खत शेतकऱ्यांवर थोपविले जात आहे.शेतीकरिता डीएपी, १०:२६:२६, २०:२०:०:१३, म्युरिट आॅफ पोटॅश, सिंगल सुपर फॉस्पेट यासारखी खते बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होतात. या खतांच्या किमती १४७५ रूपयांपर्यंत पोहोचल्या आहे. त्या तुलनेत मिश्रखतांच्या किमती कमी आहेत. यामुळे शेतकरी मिश्रखत वापरण्याकडे वळत आहेत.शेतकऱ्यांची निकड लक्षात घेत मिश्रखतामध्ये कंपन्यांनी त्यामध्ये असणारे एनपीके हे घटक कमी अधिक प्रमाणात टाकण्यास सुरूवात केली आहे. पोत्यावर दर्शविलेले हे घटक खतात आहे किंवा नाही हे सांगणे अवघड आहे. असे काही बोगस खत बाजारात आले आहे. मराठवाड्यात अशा खतांचे कारखाने सिल झाले आहेत. त्यांचा हा माल सर्वत्र वळविला जाण्याचा धोका आहे. यामुळे भरारी पथकांनी अशा खतांचा शोध सुरू केला आहे. बाजारात उपलब्ध असलेले खत नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. तर काही मिश्रखतांना विक्री बंदीचे आदेश दिले आहेत. नमुन्याच्या तपासणीनंतर मिश्रखतातील ‘कन्टेन्ट’ कळणार आहेत. सेंद्रीय खताच्या नावावर बोगस खत बजारात येत आहे. त्यामध्ये कुठले घटक आहेत, त्याची उपयोगीता, यावर कृषी विभागाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. असे खत शेतकऱ्यांनी वापरले तर पैसे व्यर्थ जाण्याचा धोका आहे.१८:१८:१० ऐवजी ९:९:५मिश्रखताच्या निर्मितीत पुरेसे ‘कन्टेन्ट’ वापरले जात नाही. यामुळे काही राज्यात मिश्रखताच्या वापरावरच बंदी आहे. महाराष्ट्रात अशी बंदी नाही. मात्र त्यामध्ये निर्देशित घटक नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. १८:१८:१० हे घटक ९:९:५ या प्रमाणात काही कंपन्यांच्या उत्पादनात आढळले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वेळेपूर्वीच असे खत शोधण्याचे आव्हान कृषी विभागापुढे आहे.

टॅग्स :agricultureशेती