शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

शेतकऱ्यांची भिस्त आता खरिपातील कपाशी अन् सोयाबीनवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 5:00 AM

तालुक्यात आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीच्या पिकाचे आहे. १७ हजार १९१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. केवळ २५७ हेक्टरवरच मुगाची लागवड करण्यात आली. २२५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. २५० हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी यावर्षी  तालुक्यात अर्ध्यावर आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कल कपाशी आणि सोयाबीनकडे दिसून येत आहे.

प्रकाश सातघरेलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यावेळी पाऊस उशिरा आल्यामुळे  शेतकऱ्यांनी मूग, ज्वारी, उडदाच्या पिकाकडे पाठ फिरविली आहे. आता त्यांची सर्व भिस्त कपाशी आणि सोयाबीनवर अवलंबून आहे.तालुक्यात आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीच्या पिकाचे आहे. १७ हजार १९१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. केवळ २५७ हेक्टरवरच मुगाची लागवड करण्यात आली. २२५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. २५० हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी यावर्षी  तालुक्यात अर्ध्यावर आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कल कपाशी आणि सोयाबीनकडे दिसून येत आहे. सोयाबीनपेक्षा तब्बल दोन हजार हेक्टर क्षेत्रात जादाची कपाशी लागवड करण्यात आली आहे. 

पावसामुळे मूग, उडीद, ज्वारीचे क्षेत्र घटलेमागीलवर्षी मूग, उडदाची लागवड जास्त करण्यात आली होती. यावर्षी ती  अर्ध्यापेक्षा कमी करण्यात  आली. ज्वारीची लागवड ५०० हेक्टरवर झाली होती. यंदा ती २२५ हेक्टरवर आली आहे. शेतकऱ्यांनी  कापूस आणि सोयाबीनला महत्त्व दिले आहे.

तालुक्यात ९५ टक्के पेरणी पूर्णसद्यस्थितीत जवळपास ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली. कपाशी, तूर व सोयाबीन पीक समाधानकारक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशी पिकाचा पेरा वाढलेला दिसतो. पावसाच्या उशिरा आगमनामुळे मूग, उडीद, ज्वारी पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. सोयाबीन पिकाबाबतीत ज्या शेतात पाणी साचत असेल, अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी सरी काढावी.- अर्जुन जाधव, मंडळ कृषी अधिकारी, दिग्रस

३७ हजार ५८८ हेक्टरवर पेरा- उशिरा पावसामुळे सुरुवातीला पेरण्या खोळंबल्या होत्या. तालुक्यात खरिपाच्या पेरणीसाठी तयार केलेले क्षेत्रापैकी आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहे. - यावेळी पावसाने दांडी मारल्याने अनेकांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. आता जोरदार पाऊस पडत असल्याने अनेकांच्या पिकांना मार बसला आहे. - शेतात पाणी जमा झाल्याने पिके पाण्यात सापडली आहे. एकंदरीत यावर्षी शेतकऱ्यांना शेती करताना मोठी कसरत करावी लागत आहे. आता अतिवृष्टीने तडाखा दिल्याने पिके पुन्हा संकटात सापडली आहे. 

शेतकऱ्यांची प्रतिक्रियामूग, उडीद आणि ज्वारी या पिकांना ठराविक काळात पाणी लागते. अनियमित पावसामुळे पिके बरोबर येत नाही. पिकांना जंगली जनावरांचा मोठा त्रास असतो. रानडुक्कर, रोही उभी ज्वारी नेस्तनाबूत करतात. दुसरीकडे मजुरांची कमतरता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे.  सोयाबीन आणि कापसाला भाव चांगले असल्यामुळे यावर्षी या पिकांकडे जादा कल आहे.- सुभाष राठोड, विठाळा

नगदी पीक म्हणून कापूस, सोयाबीन या पिकाला अधिक महत्त्व दिले जाते. उडीद, मूग आणि ज्वारीला या पिकाला मजूर लागते. ते वेळवर भेटत नाही. त्यामुळे हे पीक घेण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करते. हे पीक मेहनतीला पुरत नाही. भाव कमी राहतात. त्यामुळे कापूस, सोयाबीनला पसंती दिली आहे.- शंकर भालेराव, फेटरी

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती