शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना दमदाटी

By admin | Published: January 13, 2016 3:04 AM

तालुक्यातील हटवांजरी येथे नियोजित लघु सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना नोटीस देऊन दमदाटी करण्यात येत आहे.

वाटाघाटींची मागणी : हटवांजरी येथील लघु सिंचन प्रकल्पमारेगाव : तालुक्यातील हटवांजरी येथे नियोजित लघु सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना नोटीस देऊन दमदाटी करण्यात येत आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांसोबत सामोपचाराने चर्चा, वाटाघाटी करून त्यांच्या जमिनी अधिग्रहित कराव्या, अशी मागणी होत आहे.विदर्भ पाटबंधारे विभागाअंतर्गत हटवांजरी येथे २७८ हेक्टर सिंचन अपेक्षित असणाऱ्या लघु सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी परिसरातील ४५ शेतकऱ्यांची ६७ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी ‘दलालां’च्या माध्यमातून काही शेतकऱ्यांच्या जमिनी विक्री करून अधिग्रहित केल्या आहे. तथापि अद्याप ११ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या नाहीत.सन २००७ मध्ये जमिनी अधिग्रहणाची नोटीस मिळताच तेथील नीळकंठ महादेव कालेलकर नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, हे विशेष. त्यांच्या आत्महत्येमुळे जमीन अधिग्रहणाचे काम थंडावले होते. आता तब्बल आठ वर्षानंतर पुनश्च शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुणावरही आत्महत्येची वेळ येऊ नये, म्हणून संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी, शेतकऱ्यांना नोटीस बजावून, धाकदपट करण्यापेक्षा उर्वरित ११ शेतकऱ्यांसोबत समोपचाराने वाटाघाटी कराव्या, शेतकऱ्यांना सध्याच्या बाजारभावापेक्षा चौपट दराने मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)