शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
3
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
4
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
5
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
6
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
7
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
8
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
9
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
10
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
11
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
12
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
13
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
14
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
15
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
16
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
17
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
18
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
19
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...

भूजल संरक्षण करण्याची संधी हुकण्याची भीती

By admin | Published: June 01, 2016 12:15 AM

शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकार घेण्यात आल्याने, लोकसहभाग मिळवून ठिकठिकाणी भूजल संरक्षण, भूजल...

पुढाकाराचा अभाव : राळेगाव तालुक्यात शासकीय व राजकीय पातळीवर हालचाली संथराळेगाव : शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकार घेण्यात आल्याने, लोकसहभाग मिळवून ठिकठिकाणी भूजल संरक्षण, भूजल संवर्धनाची कामे सुरू होऊन लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यास यश येऊन आगामी पावसाळ्यात त्या-त्या क्षेत्रात पाणीसाठा वाढून भूजल पातळी वाढणार आहे. भविष्यातील पाणीटंचाई संपून विविध स्रोतात उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर शेतीच्या सिंचनाकरिताही होऊ शकणार आहे. मात्र यासाठी तालुक्यात शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकाराचा अभाव आहे. वेळीच सावध न झाल्यास भूजल संरक्षणाची संधी हुकण्याची भीती आहे. उन्हाळ्याचे तीन महिने संपत येत असताना राळेगाव तालुक्यात शासकीय पातळीवर विशेषत: कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या पाच गावातील दहा कामे, जलशिवारची कामे, मागेल त्याला शेततळे या मोजक्या आणि लोकसहभागातून लोहारा येथे झालेल्या गाळ काढण्याच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर कोणतीही दखलपात्र कामे सुरू झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकार घेतल्यास जलसंग्रह होऊ शकेल. अन्यथा पाणी वाहून जावून पुढील काळात पाणीटंचाईसह विविध प्रश्नांना तोंड देण्याची वेळ येणार आहे. तालुक्यात आजच्या स्थितीत वर्धा, रामगंगा नदी, दोन डझनावर नाले, डझनभर तलाव आटलेले आहेत. अनेक गावात विहिरी कोरड्या पडल्या आहे. काही ठिकाणी तळ गाठला आहे. हातपंपही त्याच मार्गावर आहे. भूजलपातळी २०० फुटांपेक्षा अधिक खोल गेली आहे. काही ठिकाणी २५०-३०० फूट खोल बोअर करूनही पाणी लागत नाही. अशी विपरित परिस्थिती असताना त्यापासून बोध घेत जलसंधारण, जलसंरक्षण आणि जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू होतील, अशी अपेक्षा होती. पण अद्यापपर्यंत तरी काही ठोस हालचाली झालेल्या दिसत नाही. शासकीय आदेश नाही, कोणी करावयाचे, खर्च कसा व कोठून करावयाचा यावरच हात टेकण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने आदेश दिल्यास जिल्हा परिषदेतील १२६ शाळा, ७३ ग्रामपंचायती, १२८ गावातील अंगणवाड्या, ३२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, चार प्राथमिक आरोग्य केंद्र, नऊ पशुचिकित्सालये, पंचायत समिती कार्यालयाच्या इमारती, पंचायत समिती कर्मचाऱ्यांची १५ निवासस्थाने, जिल्हा परिषद विश्रामगृह, पाणीपुरवठा विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आदी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकते. बहुतांश विभागाचा परिसर एक एकरापेक्षा अधिक विस्तीर्ण असल्याने वाहून जाणारे पाणी मुरविण्याचे नियोजन केले जाऊ शकते. तालुक्यात शासनाची ५० हून अधिक कार्यालय आहे. तीन महाविद्यालये, १३ कनिष्ठ महाविद्यालये, महत्त्वाच्या मोठा परिसर व इमारती असलेल्या डझनावर सहकारी संस्था आहेत. इंग्रजी शाळा, सहकारी बँकेच्या शाखा आहेत. त्यांनी स्वयंस्फूर्तीने जलसंवर्धनाचे व्रत स्वीकारल्यास भविष्यातील पाण्याचे संकट दूर-दूरपर्यंत टळू शकते. (तालुका प्रतिनिधी)