शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

विद्यार्थीच बनले एकमेकांचे शत्रू; क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 5:14 PM

लहान सहान कारणांवरुन विद्यार्थ्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वणीत सोमवारी सकाळी रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत.

ठळक मुद्देपालक आणि शिक्षकांचेही दुर्लक्ष, अप्रिय घटनेची भीती

यवतमाळ : अगदी क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडण्याचे प्रकार वणी शहरात वाढले आहेत. नांदेपेरा मार्गावर एक दिवसाआड अशी भांडणे पाहायला मिळत आहेत. एकमेकांचे डोके फुटेपर्यंत हा वाद विकोपाला जात असून, यातून एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोमवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. भांडणाचे कारण मात्र कळू शकले नाही. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असल्याचे सांगितले जात असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत ते शिक्षण घेत आहेत. प्रेम प्रकरणातून अशा हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतका आक्रस्ताळेपणा येतो कुठून, हा पालकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. शाळेमध्ये क्षुल्लक कारणावरून शाब्दिक वाद होतात. शाळा सुटल्यानंतर रस्त्याने घराकडे परत जात असताना याच कारणावरून पुन्हा वाद उफाळून येतो आणि त्यातून हाणामारीचे प्रकार घडत आहेत.

२१ डिसेंबरला याच मार्गावर रेल्वे गेटजवळ नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात भीषण हाणामारी झाली होती. यात एकाचे डोके फुटून त्याला तीन टाके पडले होते. दुसऱ्याही गटातील विद्यार्थी जखमी झाला होता. घटना घडताच, संबंधित शाळेतील शिक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमी विद्यार्थ्याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. रीतसर तक्रारही करण्यात आली. परंतु काही वेळानंतर दोन्ही कुटुंबात तडजोड होऊन प्रकरण मागे घेण्यात आले.

त्यानंतर सोमवारी पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली. यावेळी मात्र भांडण करणारे हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ज्या शाळेत हे विद्यार्थी शिकत आहेत त्या शाळेकडून विद्यार्थ्यांना शिस्त लावली जात नाही का, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मुलांना शाळेत पाठवून पालक होतात बिनधास्त

आपली मुले शाळेत गेल्यानंतर नेमके काय करतात, याकडे पालकांचे कायम दुर्लक्ष असते. या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र वणी शहरात पाहायला मिळते. मुलगा शाळेत गेला म्हणजे तो शिस्तीत आहे, अशा भ्रामक कल्पनेत पालक राहतात. यातूनच विद्यार्थ्यांना मोकळेपणा येतो आणि अशा घटना घडतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी