शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अखेर जंगल तुडवित अधिकारी पोहोचले पारधी बेड्यावर; गाव सोडणाऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 20:47 IST

Yawatmal News अत्याचाराला कंटाळून ६० कुटुंबांनी गाव सोडल्याची चौकशी करण्यासाठी मंगळवारी अधिकारी जंगल तुडवत पारधीबेड्यावर पोहचले व त्यांनी व्यथा जाणून घेतल्या.

यवतमाळ : गावगुंडांच्याअत्याचाराला कंटाळून पारधी बांधवांच्या ६० कुटुंबीयांना गाव सोडून जंगलात आश्रय घ्यावा लागल्याचे वृत्त ‘लोकमत’ने उजेडात आणताच प्रशासन खडबडून जागे झाले. महिनाभरापासून दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी अखेर मंगळवारी दोन किलोमीटर जंगल तुडवित पारधी बेड्यावर पोहोचून अन्यायग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या.

महागाव तालुक्यातील माळवाकद येथील पारधी बांधव गावातील काही विघातक प्रवृत्तीच्या अन्यायाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे हे नागरिक महिनाभरापूर्वी गाव सोडून पळाले. दोन किलोमीटर अंतरावर जंगलात एका तलावाच्या काठावर त्यांनी पाल ठोकून कसाबसा आश्रय घेतला; मात्र तेथेही उदरनिर्वाहासाठी त्यांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. ‘लोकमत’ने मंगळवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित करून अन्यायग्रस्तांच्या व्यथा जगापुढे मांडल्या.

त्यामुळे सकाळीच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पथक माळवाकद येथे पोहोचले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, विजया पंधरे व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक पारधी बेड्यावरील महिलांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पाठविले. हे सर्व अधिकारी-कर्मचारी माळवाकद येथे पोहोचल्यानंतर गाव सोडून गेलेल्या पारधी बांधवांची राहुटी असलेल्या जंगलाकडे निघाले; मात्र तेथे पोहोचण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नसल्याचे पाहून हे कर्मचारी काही जण दुचाकीने तर काही पायदळ राहुटीपर्यंत पोहोचले.

या दोन्ही विभागाच्या पथकांनी पारधी बांधव व तेथील महिलांची बयाणे नोंदवून घेतली. त्यांच्या गावकऱ्यांबाबतच्या नेमक्या तक्रारी काय आहेत, कोणत्या प्रकारचा अन्याय त्यांना सहन करावा लागला, याबाबत इन-कॅमेरा बयाणे घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष माळवाकद गावातील रहिवासी आणि सरपंचांच्याही भेटी घेण्यात आल्या. येथे काही मुले आई-वडिलांशिवाय असल्याचे निदर्शनास आले. त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महागाव तहसीलदारांना सूचना करण्यात आली. यासंदर्भातील लेखी अहवाल सायंकाळी उशिरा यवतमाळात पोहोचल्यानंतर दिला जाणार असल्याचे या पथकांच्या प्रमुखांनी सांगितले. समस्या सोडविण्यासोबतच गावातील दोन्ही गटात समेट घडावा या दृष्टीने प्रयत्न करण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्याचे दिसून आले.

पोलीस अधीक्षकांनी साधला संवाद

पारधी कुटुंबातील अन्यायग्रस्त महिलांना आपले म्हणणे मोकळेपणाने मांडता यावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सुरुवातीला महिला पोलीस अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठविले; मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून मंगळवारी सायंकाळी स्वत: पोलीस अधीक्षकही माळवाकद येथे दाखल झाले. प्रत्यक्ष गावकरी आणि गाव सोडून गेलेले पारधी बांधव यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

टॅग्स :Governmentसरकार