शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

शेतशिवाराला फुटला पाझर

By admin | Published: August 03, 2016 1:25 AM

दरवर्षी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा आता पाऊस नको, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

विहिरीही ओव्हर फ्लो : शेतकरी म्हणतात, वरुणराजा आता तरी थांबना ! ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ दरवर्षी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा आता पाऊस नको, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. गत महिनाभरापासून दररोज कोसळत असलेल्या पावसाने शेतशिवारांना अक्षरश: पाझर फुटले आहे. पिकांच्या सऱ्यांमधून पाणी खळखळून वाहत आहे. तर तुडुंब झालेल्या विहिरीतील पाणी उपसण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. आॅगस्टच्या पहिल्याच दिवशी वार्षिक सरासरीच्या ७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी यंदा शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. गत काही वर्षात यवतमाळ जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट होते. अपुऱ्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. मात्र यंदा हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जोरदार पाऊस कोसळत आहे. जुलै महिन्यात तर एकही दिवस पावसाने उसंत घेतली नाही. आताही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. जो दिवस उजाडतो तो ढगाळी वातावरण आणि पाऊस घेऊनच. अतिपावसाने आता शेतातील पिके धोक्यात आली आहे. पानथळ जमीन असलेल्या शेतात तर अक्षरश: पाण्याचे लोट वाहत आहे. तर काळ्या कसदार शेतातही पाणी साचले आहे. अनेक शेतातील पिकातून पाणी वाहताना दिसत आहे. पाऊस थांबत नसल्याने शेतात आंतरमशागतीचे कामे खोळंबली आहे. तर पिकेही पिवळी पडायला लागली आहे. नदी, नाल्या तीरावरील शेतांना पुराचा फटका बसत आहे. अनेकांची शेती खरडून गेली असून काहींच्या विहिरी अतिपावसाने खचल्या आहेत. शेत शिवारात असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून विहिरी तुडुंब भरलेल्या दिसत आहे. विहिरीत पाणी शेतात जाऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मोटारपंप लावून पाणी उपसणे सुरू केले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यात ओला दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सततच्या पावसाला नागरिकच नव्हे तर आता शेतकरीही कंटाळले आहे. आता वरूण राजाने विश्रांती घ्यावी, अशी विनवणीच शेतकरी करताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६३७.९८ मिमी पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या ७०.९४ टक्के हा पाऊस आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ ३०३.७१ मिमी पावसाची नोंद झाली होती. महागाव तालुक्यात तर वार्षिक सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला आहे. कळंंब वगळता बहुतांश तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस कोसळला आहे. कळंब तालुक्यात मात्र आतापर्यंत ४७.२५ टक्के पाऊस कोसळला आहे. पीक वाचविण्याची धडपड जिल्ह्यात बहुतांश क्षेत्रावर सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांची लागवड झाली आहे. सध्या या पिकांना सततच्या पावसाचा धोका निर्माण झाला आहे. तर तुरीचे पीक हे पिवळे पडले असून वेळीच पाऊस थांबला नाही तर तूर हातची जाण्याची चिन्हे आहेत. कृषी विभागाकडून अशा स्थितीत कुठल्या उपाययोजना कराव्या याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे. मात्र नेहमीप्रमाणे कृषी विभागाचे तज्ज्ञ चुप्पी साधून आहेत.