शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 11:13 AM

कर्जवाटप केवळ ४५ टक्के : नापिकी, कर्जवाटप थांबले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मागील दोन दिवसांत विदर्भात पाच शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यामध्ये यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि भंडारा जिल्ह्यात एका घटनेचा समावेश आहे. यामागे गतवर्षी झालेली नापिकी, न मिळालेली मदत आणि या वर्षी बँकांनी रोखलेले कर्जवाटप आदी कारणे असल्याचे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

मागील ४८ तासांत विनोद ढोरे (रा.दाभेविरली, जि.भंडारा), भोजराज राऊत (रा.चोरटी) व नीलकंठ प्रधान (रा.रणमोचन), जि. चंद्रपूर, बन्सी पवार (रा. गांधीनगर) व दादाराव बोबडे (रा. गगनमाळ) जि. यवतमाळ या पाच जणांनी आत्महत्या केली. या वर्षी जूनपर्यंत पश्चिम विदर्भात ६९४, तर पूर्व विदर्भात २२८ शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली. 

विदर्भात आतापर्यंत केवळ ४५ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. मागील हंगामात प्रचंड नापिकी झाली, कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही. त्यातच दुष्काळ घोषित करण्यात केला नाही. पीकविमाही समाधानकारक मिळाला नाही. यामुळे पश्चिम विदर्भापाठोपाठ आता पूर्व विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले.

अमरावतीत पाच महिन्यांत १४३ घटनामागील तीन वर्षातील सरकारी आकडेवारीनुसार, अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत चालला आहे. या वर्षी मे महिन्यापर्यंत अमरावती जिल्ह्यात १४३ शेतकरी आत्महत्या झाल्या. अमरावती जिल्ह्यात लागवडीखाली कापूस आणि सोयाबीनचा पट्टाही आहे. या जिल्ह्याच्या काही भागात नागपूर संत्र्याचीही लागवड होते. यवतमाळ जिल्ह्यात मे २०२४ पर्यंत १३२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी २०१५ ते २०२१ पर्यंत एकात्मिक कार्यक्रम सरकारकडे सादर करण्यात आला होता, अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भ