शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राज्यातील पाच हजार वित्तीय संस्था तोट्यात; १३ हजार कोटींचे कर्ज थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:10 IST

Yavatmal : टाळेही लागत असल्याने ठेवीदार चिंतेत

पवन लताड लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील २१ हजार १४ पैकी तब्बल पाच हजार ११२ वित्तीय संस्था तोट्यात असल्याची आकडेवारी समोर आली आहे. संस्थांनी वितरित केलेल्या कर्जापैकी १३ हजार २०४ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. दरवर्षी तोट्यात जाणाऱ्या वित्तीय संस्थांची संख्या वाढत आहे.

सहकार विभागाकडून बिगर कृषी सहकारी पतपुरवठा संस्था उभारणीसाठी मंजुरी दिली जाते. सद्य:स्थितीत १४ हजार १३८ नागरी सहकारी पतपुरवठा संस्था आहेत. त्यापाठोपाठ सहा हजार ४३१ पगारदार नोकरांच्या सहकारी पतपुरवठा संस्था, तर ४४५ नागरी सहकारी बँकांची सहकार विभागाकडे नोंद आहे. या संस्थांमध्ये २८७.८७ लाख सभासद आहेत. शिवाय, एक लाख १३ हजार ९७२ कोटींच्या ठेवी आहेत. या संस्थांनी ८२ हजार ४३३ कोटींचे कर्ज वितरित केले आहे. त्यापैकी ८१ हजार २७० कोटींचे कर्ज येणे बाकी आहे.

५५ हजार ५६३ कोटींची कर्जवसुली असून, थकीत कर्ज १३ हजार २०४ कोटी रुपयांचे आहे. नफ्यात १५ हजार १५१ संस्था दिसत असल्या तरी तोट्यातील पाच हजार ११२ संस्था पाहता, ठेवीदारांची चिंता वाढली आहे. गत काही वर्षांपासून सहकार विभागाच्या अधिनस्त असलेल्या पतसंस्था, खासगी बँका बुडण्याचे प्रमाण वाढले आहे. संचालक मंडळांकडून अपहार झाल्याने कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत.

५०% पणन संस्थाही डबघाईसराज्यात सहकारी पणन संस्था एक हजार २४१ आहेत. त्यापैकी ६१२ संस्था डबघाईस आल्या आहेत. सभासद संख्याही १० लाख ३६ हजारांहून दहा लाखांवर आली. शेतमाल, खते, बियाणे, ग्राहकोपयोगी वस्तू विक्रीही फारशी समाधानकारक नाही. भागभांडवल २०२३ च्या तुलनेत एक कोटीने घटले आहेत.

ठेवीदारांना न्यायाची प्रतीक्षाराज्यात वित्तीय संस्था बुडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. यवतमाळ जिल्ह्यात गत काही महिन्यांत सहा ते सात वित्तीय संस्थांमधील अपहार समोर आले. या प्रकरणांत पोलिसात गुन्हे दाखल आहेत. अशीच स्थिती काही जिल्ह्यांत घडली आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी एमपीआयडी कायदा राज्यात लागू आहे. मात्र, कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने हजारो ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत.

टॅग्स :bankबँकYavatmalयवतमाळ