शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

तलावफैलात टँकरची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:10 PM

शहरातील जुन्या वसाहतीमध्ये अरूंद रस्त्यांमुळे टँकर आतपर्यंत शिरतच नाही. अशा ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी रात्री मैलोन्मैल पायपीट करावी लागते.

ठळक मुद्देलोहाऱ्यातून आणावे लागते पाणीचारच हापशा जिवंत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील जुन्या वसाहतीमध्ये अरूंद रस्त्यांमुळे टँकर आतपर्यंत शिरतच नाही. अशा ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी रात्री मैलोन्मैल पायपीट करावी लागते. यावर मात करण्यासाठी तलाव फैलातील नागरिकांनी लोकवर्गणी करून विहिरीतला गाळ उपसला. पण हे पाणी अपुरे पडत आहे. विहिरीचे खोलीकरण केल्यास मुबलक पाणी लागेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाने विलंब लावला. यामुळे तलाव फैलातील काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील महिला दिवसभर काम करून पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार आहे.तलाव फैलमधील पॉवर हाऊसमध्ये २३ दिवसानंतर नळ आले. या नळाचे पाणी परिसरातील अर्ध्या भागाला मिळालेच नाही. प्राधिकरणाची पाईपलाईन चोकअप झाल्याने हे पाणी अनेकांच्या घरापर्यंत पोहोचले नाही. या भागातील नागरिकांनी नगरसेवक आणि जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केली. पण चोकअप निघाला नाही. यामुळे या भागात अजूनही पाणी आले नाही, असे मत महेश ठाकरे यांनी व्यक्त केले.या भागात हापशीला सबमर्शिबल पंप लावून शौचालयात नेले आहे. या टंचाई काळामध्ये नागरिकासाठी हापशी मोकळी केली तर, पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना व्हाव्या आणि या हापशीवरून नळाचे पॉर्इंट या भागात दिले, तर पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटेल, असे मत लता राऊत यांनी व्यक्त केले.तलाव फैलातील काही भाग आणि गवळीपुरामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. या भागातील अरूंद रस्त्यामध्ये टँकर शिरत नाही. यामुळे आम्हाला टँकरचे पाणी मिळाले नाही. अरूंद रस्त्यांच्या वस्तीमध्ये विहीर आहे. या विहिरीचे पाणी खोल गेले आहे. यामुळे नागरिकांनी लोकवर्गणी करून विहिरीतला गाळ काढला. नगरपरिषदेने या विहिरीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप नागरिकांनी केला. त्याला खोल केल्यास पाणीटंचाई संपेल. ब्लिचिंग टाकल्यास विहिरीतील पाणी स्वच्छ होईल, असे शोभा मस्के, जया विंचूरकर, प्रज्ञा दांडेकर, रेखा जीवतोडे, पुष्पा मस्के म्हणाल्या.या भागातील नागरिकांना पंचशील चौक, छोटी गुजरी, लोखंडी पुल, जीनमधून पाणी आणावे लागते. दिवसभर काम करून महिला गुंडाने पाणी भरतात. तर काही जण रात्रीला रिक्षाच्या माध्यमातून पाणी आणतात. अनेकांना पाण्यासाठी कामावर जाता येत नाही. यातून अनेकांची रोजमजुरी बुडाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पुष्पा माने, मनिषा बानोरे, यांनी केला.पाणीटंचाई नसतानाही या भागातील नागरिकांना पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागते. नळाच्या प्रतीक्षेत रात्र जागून काढावी लागते. मोटर लावल्याशिवाय वर पाणी चढत नाही. वारंवार तक्रारी करूनही हा प्रश्न निकाली काढला नाही. आता त्यांना भीषण पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.लोहाऱ्यातून आणावे लागते पाणीपाण्याची तजवीज करताना, नागरिकांनी लोहाºयाकडे धाव घेतली आहे. या ठिकाणावरून खासगी आॅटोरिक्षा आणि अ‍ॅपेमध्ये पाणी भरून आणावे लागत आहे. अनेकांकडे पाण्याची साठवणूक करण्यासाठी टाक्या नाही. तर अनेकांना पाण्याच्या टाक्या भाड्याने घ्याव्या लागल्या आहेत.चारच हापशा जिवंतया भागात पाण्याच्या ९ हापशांपैकी चार हापशांनाच पाणी आहे. यामुळे नागरिकांना हातपंपावरून पाणी भरण्यासाठी जिवंत स्त्रोतांकडे धाव घ्यावी लागते. यामुळे पाण्याच्या स्त्रोतावर प्रचंड गर्दी उसळत आहे.

टॅग्स :Waterपाणी